शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

एसटी भरतीत इच्छुकांना दिलासा : अनुभवाची अट शिथील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:07 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदाच्या ८ हजार २२ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करून एक वर्ष करण्याचा निर्णय बारा जिल्ह्यांमधील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतपुरेसे उमेदवार मिळेनात, महिलांचा अत्यल्प प्रतिसाद 

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदांच्या भरती प्रक्रियेत तीन वर्ष अवजड वाहन चालविण्याच्या अटीमुळे अर्ज कमी आले आहेत. महिलांचा अत्यल्प प्रतिसाद मिळला आहे. त्यामुळे आता हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. तसेच पुरूष उमेदवारांना असलेली तीन वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करून एक वर्ष करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. सध्या सुरु असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत. आतापर्यंत केवळ २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. यापार्श्वभुमीवर महिला उमेदवारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने शुक्रवारी काही महत्वपुर्ण निर्णय घेतले. आधीच्या निर्णयानुसार महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट आता रद्द करण्यात आली आहे. सुधारित निर्णयानुसार हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.  भरती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या महिलांना महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे एक १ वर्षा  प्रशिक्षण देण्यात येईल. या कालावधीत त्यांना विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना घ्यावा लागेल. त्यानंतर या महिला एसटी बस चालवू शकतील. त्याचप्रमाणे महिलांच्या शारीरीक उंचीची अटही शिथील करुन ती आता किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी इतकी कमी करण्यात आली आहे. पुरूष उमेदवारांनाही दिलासा देण्यात आला आहे. त्यांना अवजड वाहन चालविण्याचा तीन वर्षांच्या अनुभवाच्या अटीमध्ये शिथीलता करण्यात आली आहे. त्यानुसार अवजड वाहन चालविण्याचा १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही भरतीसाठी पात्र ठरतील. --------अर्ज करण्यास मुदतवाढमहामंडळामार्फत चालक व वाहक पदाच्या ८ हजार २२ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. बारा जिल्ह्यांमधील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण अटी शिथील केल्याने आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. इच्छुकांना आता दि. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावते