शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दहावी परीक्षा घेण्याचे आदेश देणे योग्य आहे का?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:17 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने १९ एप्रिल रोजी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला

मुंबई : कोरोनामुळे सध्या दहावीची परीक्षा घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याने राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून परीक्षा घेण्याचा आदेश देणे योग्य आहे का? असे उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच सुनावणी ३ जूनपर्यंत तहकूब केली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने १९ एप्रिल रोजी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पुण्याचे प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मंगळवारी या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.न्यायालयाने कुलकर्णी यांचे वकील उदय वारुंजीकर यांना याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने वारुंजीकर यांना गुरुवारपर्यंत मुदत दिली.                                               आमचे सकृतदर्शनी निरीक्षण असे आहे की, राज्य सरकारने घेतलेले काही निर्णय कदाचित योग्य नसतील; परंतु, आम्ही कितपत आमच्या अधिकारांचा वापर करायचा, याबाबत आम्हाला जाणीव आहे, असे न्यायालयाने म्हटले.जर राज्य सरकार म्हणत असेल की दहावीची परीक्षा घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाही, तर आम्ही त्यात हस्तक्षेप करून राज्यातील परिस्थिती परीक्षेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे परीक्षा घ्या, असे सांगू का? असे न्यायालयाने म्हटले.कोरोना महामारीची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही भयानक आहे. या वर्षी कोरोनाने प्रामुख्याने तरुणांना लक्ष्य केले आहे. मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, असे म्हणत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी ३ जूनपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट