शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नामदेव अध्यासनातून संतवाङ्मयाचा प्रसार

By admin | Updated: July 31, 2016 00:54 IST

संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली.

पुणे : संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून समता आणि प्रभु-भक्तीची शिकवण दिली. संतवाङ्मयाचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार तसेच, राष्ट्रीय एकात्मता साधणे यादृष्टीने १९८४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्यात आले. संत नामदेवांवरील साहित्याची सूची, नामदेवांच्या गाथेचे नव्याने संपादन असे प्रकल्प अध्यासनाच्या माध्यमातून राबवले गेले असून, ते पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न होत आहेत. गाथेच्या संपादनासाठी संत साहित्याच्या अभ्यासकांची संपादन समिती स्थापन करण्यात आली. हा प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने अध्यासनावर अभ्यासू व्यक्तीची निवड करून प्रकल्पांना गती मिळावी, यादृष्टीने विद्यापीठाकडून एक समिती नेमली असून समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्त केला आहे.पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन स्थापन झाल्यानंतर १९८५ ते २००० अशी १५ वर्षे डॉ. अशोक कामत यांनी या अध्यासनाचे नेतृत्व केले. या अध्यासनाने लोकाश्रय मिळवून सुमारे दीडशे शोधप्रकल्प विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पुरे केले. नामवंत अभ्यासकांकडून त्यांनी संदर्भग्रंथ मिळवणे, अध्यासनाचे ग्रंथालय, भारतीय संतसाहित्य, संस्कृती व इतिहासाला पूरक ठरतील, असे शोधप्रकल्प अध्यासनाने हाती घेतले व पूर्ण केले. अध्यासनातर्फे भारतीय संस्कृती संतसाहित्य व तत्त्वज्ञान यावरील सर्वाेत्कृष्ट ग्रंथलेखनासाठी दर वर्षी ग्रंथकार आणि प्रकाशक यांना परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. संतसाहित्यावरील संशोधनकार्याचा गौरव म्हणून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार व संत नामदेव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. डॉ. कामत यांच्या निवृत्तीनंतर हिंदीच्या अभ्यासक डॉ. वीणा मनचंदा यांनी अध्यासनाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीही अध्यासन अधिक समाजोन्मुख करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही धुरा अविनाश आवलगावकर यांच्याकडे आली. त्यांनी पावणेदोन वर्षांच्या कालावधीत ‘नवीन परिप्रेक्ष्यातून नामदेव गाथेचा अभ्यास,’ ‘१९ व्या शतकातील धर्मचिंतन’ आणि ‘आधुनिक भारतातील धर्मचिंतन’ या महत्त्वाच्या विषयांवर तीन राष्ट्रीय चर्चासत्रे घेतली. >एका वर्षात उभारले दोन मजली महाविद्यालयघुमान येथील साहित्य संमेलनानंतर आकारास आलेल्या ‘बाबा नामदेव महाविद्यालया’चे उद्घाटन दि. १७ जुलै रोजी करण्यात आले. पंजाबमधील घुमानमध्ये मागील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. यात भारतीय भाषा भवन आणि महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यानुसार महाविद्यालयाचे भूमिपूजन संमेलनादरम्यान झाले होते. एका वर्षात दोनमजली महाविद्यालय उभे राहिले असून, त्याला ‘बाबा नामदेव महाविद्यालय’ असे नाव दिले आहे. अमृतसरमधील गुरुनानक विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्याच्या कामाला वेग आला असून त्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशीही बोलणी सुुरू आहेत.