शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नामदेव अध्यासनातून संतवाङ्मयाचा प्रसार

By admin | Updated: July 31, 2016 00:54 IST

संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली.

पुणे : संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून समता आणि प्रभु-भक्तीची शिकवण दिली. संतवाङ्मयाचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार तसेच, राष्ट्रीय एकात्मता साधणे यादृष्टीने १९८४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्यात आले. संत नामदेवांवरील साहित्याची सूची, नामदेवांच्या गाथेचे नव्याने संपादन असे प्रकल्प अध्यासनाच्या माध्यमातून राबवले गेले असून, ते पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न होत आहेत. गाथेच्या संपादनासाठी संत साहित्याच्या अभ्यासकांची संपादन समिती स्थापन करण्यात आली. हा प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने अध्यासनावर अभ्यासू व्यक्तीची निवड करून प्रकल्पांना गती मिळावी, यादृष्टीने विद्यापीठाकडून एक समिती नेमली असून समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्त केला आहे.पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन स्थापन झाल्यानंतर १९८५ ते २००० अशी १५ वर्षे डॉ. अशोक कामत यांनी या अध्यासनाचे नेतृत्व केले. या अध्यासनाने लोकाश्रय मिळवून सुमारे दीडशे शोधप्रकल्प विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पुरे केले. नामवंत अभ्यासकांकडून त्यांनी संदर्भग्रंथ मिळवणे, अध्यासनाचे ग्रंथालय, भारतीय संतसाहित्य, संस्कृती व इतिहासाला पूरक ठरतील, असे शोधप्रकल्प अध्यासनाने हाती घेतले व पूर्ण केले. अध्यासनातर्फे भारतीय संस्कृती संतसाहित्य व तत्त्वज्ञान यावरील सर्वाेत्कृष्ट ग्रंथलेखनासाठी दर वर्षी ग्रंथकार आणि प्रकाशक यांना परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. संतसाहित्यावरील संशोधनकार्याचा गौरव म्हणून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार व संत नामदेव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. डॉ. कामत यांच्या निवृत्तीनंतर हिंदीच्या अभ्यासक डॉ. वीणा मनचंदा यांनी अध्यासनाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीही अध्यासन अधिक समाजोन्मुख करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही धुरा अविनाश आवलगावकर यांच्याकडे आली. त्यांनी पावणेदोन वर्षांच्या कालावधीत ‘नवीन परिप्रेक्ष्यातून नामदेव गाथेचा अभ्यास,’ ‘१९ व्या शतकातील धर्मचिंतन’ आणि ‘आधुनिक भारतातील धर्मचिंतन’ या महत्त्वाच्या विषयांवर तीन राष्ट्रीय चर्चासत्रे घेतली. >एका वर्षात उभारले दोन मजली महाविद्यालयघुमान येथील साहित्य संमेलनानंतर आकारास आलेल्या ‘बाबा नामदेव महाविद्यालया’चे उद्घाटन दि. १७ जुलै रोजी करण्यात आले. पंजाबमधील घुमानमध्ये मागील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. यात भारतीय भाषा भवन आणि महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यानुसार महाविद्यालयाचे भूमिपूजन संमेलनादरम्यान झाले होते. एका वर्षात दोनमजली महाविद्यालय उभे राहिले असून, त्याला ‘बाबा नामदेव महाविद्यालय’ असे नाव दिले आहे. अमृतसरमधील गुरुनानक विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्याच्या कामाला वेग आला असून त्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशीही बोलणी सुुरू आहेत.