शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

विशेष: अक्षरांना प्राणतत्त्व देणारे गुरू डॉ. विठ्ठल वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:56 IST

काव्य रसात्मक असले पाहिजे, कविता कागदासाठी नसते, कविता माणसाचं दु:ख मांडण्यासाठी, ते हलकं करण्यासाठी असते.

ग्रामसंस्कृती आणि शेती हा अर्थार्जनाचा एकमेव व्यवसाय. या पार्श्वभूमीवर मी १९७०च्या आसपास लिहिता झालो. लेखनाची आणि संवादाची वाट शोधत अंबाजोगाईपासूनच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पदरची भाकरी घेऊन हजेरी लावली. तेव्हा कुठं थोडी फार वाट सापडली. परंतु १९८१ ला श्रीरामपूर येथे शब्दालय प्रकाशनाच्या वर्धापन दिनात डॉ. विठ्ठल वाघ यांची थेट मनाला भिडणारी कविता ऐकून भारावून गेलो आणि गुरू सापडल्याचे समाधान अक्षर झाले. 

काव्य रसात्मक असले पाहिजे, कविता कागदासाठी नसते, कविता माणसाचं दु:ख मांडण्यासाठी, ते हलकं करण्यासाठी असते. ईश्वराचा साक्षात्कार निसर्गच आहे. कृषकांनी आता आक्रमक झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहिती होत गेल्या. सर्वांत महत्त्वाचं कागदावरच्या अक्षरांना प्राणतत्त्व देऊन आशयाची आकृती रसिकांपुढे उभी राहिली पाहिजे, हे बापूंच्या (विठ्ठल वाघ यांच्या) कविता सादरीकरणातून अवगत  होत गेले. 

बैल घराची श्रीमंतीबैल दारचे वैभवबैल माझ्या घरातलापिढ्यापिढ्यांचा उत्सव (बैल)

आम्ही मेंढरं मेंढरंयावं त्यानं हाकलावंपाचा वर्साच्या बोलीनंहोते आमचा लिलाव

काया मातीत मातीततिफन चालतेइज नाचते थयथयढग ढोल वाजवते...

भाषेची मौलिकता, मौखिकता असते. ही मौखिकता समूहाशी संवाद साधते. मी का लिहितो? त्या परिसराने माझा पिंड पोसला, त्या परिसराची जाणीव, वेदना माझ्या लेखनात आहे काय? तू काळाचे प्रतिनिधित्व करणार आहेस का? वर्तमानाशी संवाद असणे गरजेचे आहे. या सर्व जाणिवा मला प्रकर्षाने बापूंच्या कवितेने दिल्या. कवीचा स्वर हा कवितेसाठी मातृस्वर आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातिले, हे सामर्थ्य त्या स्वरांमध्ये असते. तसेच मुक्तछंदाच्या शापातून जर मराठी कवितेला सोडवायचे असेल तर कवितेला समूहसंवेदी आणि लयीची नितांत गरज आहे. स्वर अक्षरांना अमरत्व देतो. या सर्वांचा साक्षात्कार बापूंच्या कवितेतून झाला. त्यामुळेच जाणतेपणाने गुरू अभ्यासावा, ही जाण माझे ठायी आली. थेट विठ्ठलाशी भांडण्याचं धारिष्ट्य मला मिळालं.

काय रे तू माझी, वाहशील चिंतातूजशीस दाता, मी शेतकरीतुझीच गा चिंता, मी वाहतो रातंदिनतुज पायी अन्न, उभवितोकाय तू ही तिथे, उभा विटेवरीअरे इथे पंढरी, काळीमाय

टॅग्स :LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्र