शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आधी विधानसभेचे बोला, लोकसभेचे नंतर बघू; शिवसेनेच्या 'या' प्रस्तावामुळे भाजप कात्रीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 08:38 IST

देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना राज्यात मात्र विधानसभेवरून युतीचे घोडे अडले आहे. शिवसेनेने भाजपाला कात्रीत पकडण्याचे ठरविले आहे. यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाचा युतीचा फॉर्म्युला त्यांनी पुढे केला आहे.

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना राज्यात मात्र विधानसभेवरून युतीचे घोडे अडले आहे. शिवसेनेने भाजपाला कात्रीत पकडण्याचे ठरविले आहे. यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाचा युतीचा फॉर्म्युला त्यांनी पुढे केला आहे. आधी विधानसभेचा फॉर्म्युला मान्य करा त्यानंतर लोकसभेचे ठरवू, असा इशारा शिवसेनेने दिल्याने मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपाला झुकावे लागणार असल्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते. 

 महाराष्ट्र विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत शिवसेनेने 171 आणि भाजपाने 117 जागा लढविल्या होत्या. सहाजिकच शिवसेनेच्या जागा जास्त आल्याने युती सरकारच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपाच्या उपमुख्यमंत्री राज्यात बसला होता. यावेळीही शिवसेनेने भाजपाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव चांगलाच गाठीशी असल्याने आधी विधानसभेच्या जागांचे बोला, मग लोकसभेचे ठरवू अशी भुमिका घेत सेनेने भाजपाला अडचणीत टाकले आहे. 

जर 1995 चा फॉर्म्युला भाजपाने मान्य केल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात करावा लागणार आहे. अन्यथा युती तुटल्यास याचा थेट फटका भाजपाला बसणार असून खासदारांची संख्या कमालीची घटणार आहे. देशभरात मित्रपक्षांसह मतदारही केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जात आहेत. अशातच विरोधकांनी महाआघाडी केल्यास त्याचा फटका भाजपाला बसणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये भाजपला बहुमतापासून  30 ते 40 जागा कमी पडणार आहे. शिवाय उत्तर प्रदेशमध्येही कमालीची पिछेहाट होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे त्यापाठोपाठ जास्त जागा असलेले राज्य महाराष्ट्रही हातचे गेल्यास बहुमताची जुळलाजुळव करणे अशक्य होणार असल्याचे भाजपामध्ये बोलले जात आहे. 

यामुळे महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेचा प्रस्ताव मान्य करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे केल्यास भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील निवडणुकीत उपमुख्यमंत्री पदावर राहावे लागणार की त्यांना लोकसभेचे तिकीट मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी