शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकबोटे-भिडेंच्या बैठकांमुळे पडली ठिणगी, दंगल पुर्वनियोजित कटच : सत्यशोधन समितीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 19:31 IST

कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पुर्वनियोजित कट असल्याचा दावा विविध संघटनांच्या सत्यशोधन समितीने केला आहे.

पुणे : कोरेगाव-भीमा येथे झालेली दंगल पुर्वनियोजित कट असल्याचा दावा विविध संघटनांच्या सत्यशोधन समितीने केला आहे. मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी वढु बु. येथे घेतलेल्या बैठकांमुळे त्याची ठिणगी पडली. दंगलीदरम्यान मुस्लिम व बौध्द समाजातील लोकांची दुकाने, वाहने जाणीवपुर्वक लक्ष्य केली. त्यासाठी राज्याच्या इतर भागातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आल्याचा दावाही समितीने केला आहे. 

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, लाल निशान पक्षाचे सचिव भिमराव बनसोड, सत्यशोधक जागर मासिकाच्या संपादक प्रा. प्रतिमा परदेशी, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले यांचा सत्यशोधन समितीत समावेश आहे. त्यांनी दि. ४ जानेवारीला वढु, सणसवाडी, कोरेगाव भीमा या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. यावेळी नोंदविलेल्या निरीक्षणांचा अहवाल शुक्रवारी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. पाटणकर म्हणाले, गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी बाहेरून आलेल्यांनी ही दंगल घडवून आणल्याचे सांगितले. यामध्ये गावातील लोकांचा समावेश नाही. गावातील मुस्लिम व बौध्द समाजातील लोकांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते. त्यांची घरे, दुकाने, गॅरेज, वाहनांची जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. त्याची झळ गावातील लोकांनाही बसली. यावरून विशिष्ट विचार करणा-या लोकांनीच हे घडवून आणले असून हा पुर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होते. एकबोटे व भिडे यांचे यापुर्वी या भागात दौरे झाले आहेत. त्यांनी घेतलेल्या बैठकांमधून वातावरण तयार करण्याचे काम केले. दंगलीची ठिणगी पडायला याच बैठका कारणीभुत ठरल्या. याबाबत माहिती असताना राज्य शासनाने चौकशी केली नाही. तसेच दंगलीच्या दिवशीही पोलिस वेळेवर पोहचले नाहीत. 

वढु (बु.)ला जमून चाकण रस्ता, सणसवाडी, कोरगाव भीम चौक येथे भगवे झेंडे घेतलेला जमाव बाहेरून आला होता. हा जमाव चार किलोमीटर चालत मुख्य रस्त्यावर येवून दगडफेक करेपर्यंत पोलिस गप्प का बसले. सणसवाडीत ग्रामपंचायतीचा ठराव बघता व परिसरात चाललेल्या हिंदुत्व आघाडीतील सभांमधील प्रचार होऊनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कृती केली नाही. भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ पोलिसांची उपस्थितीही तुरळक तर वढु बु. ला मोठी कुमक होती. सणसवाडी येथे नुकसान झालेले सर्वजण एकतर मुस्लिम किंवा बौध्द आहेत. स्थानिक मराठा शेतकरी कुटूंबाचे कोणेतही नुकसान झालेले समोर आले नाही, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

अहवालातील प्रमुख मुद्दे - 

- गाड्या जाळण्यासाठी ज्वालाग्रही पदार्थांची आधीपासूनच तयारी

- इमारतीच्या वरच्या मजल्यावर दगड जमा केले 

- मुस्लिम व बौध्दांना जाणीवपुर्वक लक्ष्य

- पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह

- समाज परिवर्तन ऐक्य स्तंभ घोषित करावा

- दंगलीची विनाविलंब न्यायालयीन चौकशी करावी

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी