शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:50 IST

Abu Azmi on Hindi Language Controversy: राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी शिकवण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाने वादंग उठला आहे. विद्यार्थ्यांवर ...

Abu Azmi on Hindi Language Controversy: राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी शिकवण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाने वादंग उठला आहे. विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. एकीकडे मराठी साहित्यिकांसह मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हिंदी भाषा शिकवण्याला विरोध सुरु आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु आझमी यांनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा घोषित केले पाहिजे असं म्हटलं. तसेच हिंदी भाषा कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बोलली गेली पाहिजे, असंही अबू आझमी म्हणाले. त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक आराखड्यातील तरतुदींनुसार महायुती सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार पहिलीच्या वर्गापासून हिंदीची सक्ती रद्द करण्यात आली नसली तरी पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकणं बंधनकारक असणार आहे. पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूच शिकवण्यात येणार असल्याने विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला. मात्र अबू आझमी यांनी हिंदी भाषेवरुन काही लोक राजकारण करत असल्याचे म्हटलं.

"राज्य सरकारने तीन भाषांच्या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. मराठी ही इथली पहिली भाषा आहे. दुसरी भाषा इंग्रजी आहे. आपली लोकं गुलाम आहेत म्हणून इंग्रजीच्या मागे पळत आहेत आणि देशभरात तिसरी भाषा हिंदी आहे. संसदेत एक समिती आहे जी देशभर हिंदीचा प्रचार करण्यासाठी जाते आणि केंद्र सरकारचे सर्व काम हिंदीमध्येच होते. काही लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. हिंदी भाषा संपूर्ण देशात अनिवार्य आहेच. हिंदीला १०० टक्के राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले पाहिजे. एकच भाषा जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बोलली पाहिजे. मी आसामला गेलो तर आसामी शिकायचे का? एकच भाषा असली पाहिजे जी संपूर्ण देशात वापरली गेली पाहिजे," असं अबू आझमी म्हणाले.

दरम्यान, त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सोमवारी : त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. "मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीmarathiमराठीhindiहिंदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरे