शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उस्मानाबादेत सोयाबीन पीकविमा वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:09 IST

उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ८१,७७३ शेतकरी पीक कापणी प्रयोगातील त्रुटी मुळे खरीप २०१७ मधील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित होते.

उस्मानाबाद : माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तडवळा ता.जि. उस्मानाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरीत करण्यात आला.

उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ८१,७७३ शेतकरी पीक कापणी प्रयोगातील त्रुटी मुळे खरीप २०१७ मधील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित होते. सदरील चुका जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त,कृषी आयुक्त यांच्यासह कृषी, महसूल,मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांवरील अन्याय दुर करत पीक नुकसानी पोटी विमा भरपाई देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.

याबाबत विविध आंदोलने देखील करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी पीक कापणी प्रयोगामध्ये झालेल्या चुका मान्य करत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मदत काही मिळत नव्हती. मुख्यमंत्री सकारात्मक असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे शासन स्तरावर होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाद मागावी लागली होती.  मा. उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची मागणी ग्राह्य धरत दोन महिन्याच्या आत पीक विमा वितरित करण्याचे आदेशीत केले.

त्यानुसार शासनाने उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्या पासून वंचित राहिलेल्या ८१७७३ शेतकऱ्यांना रु २९. ९४ कोटी पीक विम्यापोटी वितरित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे वर्ग केले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे.

राणाजगजितसिंह पाटील साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विमा रक्कम वितरित करण्यात आली. तडवळा शाखेअंतर्गत येणाऱ्या तडवळा,गोपाळवाडी, दुधगाव, कोंबडवाडी,खामगाव या गावातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विम्याची रक्कम वाटप करण्यात आली.

शासनाने सुरुवातील रु.५६.६१कोटी मंजुरीचा आदेश निर्गमीत केला होता. परंतु यात सुधारणा करत ही रक्कम रु.२९.९४ कोटी करण्यात आली. कपात केलेली रक्कम मिळणेबाबत न्यायालयात बाजु मांडण्यात आली असुन याबाबत दि.२३/०९/२०१९  रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. ही रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठी लढा सुरुच ठेवण्याचे आश्वासन यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.

यावेळी भाजपा  जिल्हाध्यक्ष दत्ता  कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, सरचिटणीस सतिश देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सतिश दंड नाईक, भारत डोलारे, त्र्यंबक कचरे, नाना वाघ, पंचायत समिती सदस्य सुधीर करंजकर, नगरसेवक बालाजी कोरे,शशांक सस्ते, भारत लोंढे, बँकेचे शाखा अधिकारी आर. एस घुटे व सर्व कर्मचारी यांच्यासह बहुसंख्याने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.