शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उस्मानाबादेत सोयाबीन पीकविमा वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:09 IST

उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ८१,७७३ शेतकरी पीक कापणी प्रयोगातील त्रुटी मुळे खरीप २०१७ मधील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित होते.

उस्मानाबाद : माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तडवळा ता.जि. उस्मानाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरीत करण्यात आला.

उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ८१,७७३ शेतकरी पीक कापणी प्रयोगातील त्रुटी मुळे खरीप २०१७ मधील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित होते. सदरील चुका जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त,कृषी आयुक्त यांच्यासह कृषी, महसूल,मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांवरील अन्याय दुर करत पीक नुकसानी पोटी विमा भरपाई देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.

याबाबत विविध आंदोलने देखील करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी पीक कापणी प्रयोगामध्ये झालेल्या चुका मान्य करत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मदत काही मिळत नव्हती. मुख्यमंत्री सकारात्मक असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे शासन स्तरावर होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाद मागावी लागली होती.  मा. उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची मागणी ग्राह्य धरत दोन महिन्याच्या आत पीक विमा वितरित करण्याचे आदेशीत केले.

त्यानुसार शासनाने उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्या पासून वंचित राहिलेल्या ८१७७३ शेतकऱ्यांना रु २९. ९४ कोटी पीक विम्यापोटी वितरित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे वर्ग केले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे.

राणाजगजितसिंह पाटील साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विमा रक्कम वितरित करण्यात आली. तडवळा शाखेअंतर्गत येणाऱ्या तडवळा,गोपाळवाडी, दुधगाव, कोंबडवाडी,खामगाव या गावातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विम्याची रक्कम वाटप करण्यात आली.

शासनाने सुरुवातील रु.५६.६१कोटी मंजुरीचा आदेश निर्गमीत केला होता. परंतु यात सुधारणा करत ही रक्कम रु.२९.९४ कोटी करण्यात आली. कपात केलेली रक्कम मिळणेबाबत न्यायालयात बाजु मांडण्यात आली असुन याबाबत दि.२३/०९/२०१९  रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. ही रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठी लढा सुरुच ठेवण्याचे आश्वासन यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.

यावेळी भाजपा  जिल्हाध्यक्ष दत्ता  कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, सरचिटणीस सतिश देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सतिश दंड नाईक, भारत डोलारे, त्र्यंबक कचरे, नाना वाघ, पंचायत समिती सदस्य सुधीर करंजकर, नगरसेवक बालाजी कोरे,शशांक सस्ते, भारत लोंढे, बँकेचे शाखा अधिकारी आर. एस घुटे व सर्व कर्मचारी यांच्यासह बहुसंख्याने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.