सोयाबीन पिकाची झाली अवास्तव वाढ !

By Admin | Updated: August 20, 2016 16:32 IST2016-08-20T16:32:53+5:302016-08-20T16:32:53+5:30

पाऊस सतत सुरू असल्याने अकोल्यात सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे.

Soya bean grows unrealistic! | सोयाबीन पिकाची झाली अवास्तव वाढ !

सोयाबीन पिकाची झाली अवास्तव वाढ !

राजरत्न सिरसाट
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० -  यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने पिकांना पोषक ठरला आहे पण पाऊस सतत सुरू  असल्याने सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे. शेतक-यांनी किटकनाशके फवारणी करतांना त्यामध्ये पीक वाढीसाठीची संजिवके वापरली व खताचा अतिरिक्त वापर केल्याने सोयाबीन पीक जोमदार वाढले आहे.परिणामी अनेक ठिकाणी  फुले व शेंगावर प्रतिकुुल परिणाम झाल्याने फुले,शेंगाची संख्या घटली आहे.
 
 यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतक-यांनी वेळेवर पेरणी केली सुरू वातीला पिकांना पोषक ठरणारा पाऊस सतत सुरू  असल्याने पिके पिवळी पडली.सोयाबीनवरही त्याचे परिणाम झाले. विदर्भात यावर्षी सर्वाधिक १३ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. सलग चार ते पाच वर्षापासून सोयाबीन चे उत्पादन कमी होत आहे यावर्षी पाऊस पूरक असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची दाट पेरणी केली.त्यासाठी खतांचा व किटकनाशकांसोबत पिकवाढीसाठीची संजिवके वापरली अनेक शेतकºयांनी संजिवके, विद्राव्य द्रावणाचा मोठ्याप्रमाणावर वापर केला.त्याचा परिणाम सोयाबीन पिक वाढीवर झाला आहे. अनेक भागात सोयाबीनची गुडघ्याएवढी वाढ झाली आहे. खते आणि संजिवक ामुळे तयार होणारे अन्नद्रव्य झाडांची वाढ करीत आहे. शिवाय दाट पेरणी केल्याने सुर्यप्रकाश जमिनीपर्यंत म्हणजेच झाडांच्या मुळापर्यंत पोहोचत नसल्याने केवळ झाडांची शेंडे प्रकाशसंश्लेषण करतात येथेच अन्नद्रव्य तयार केले जाते आणि मुळाशी असलेल्या पानांना अन्नद्रव्य पोहोेचत नसल्याने झाडांच्या शेंड्यांनी तयार केलेले अन्नद्रव्य मुळाची पाने शोषूण घेतात परिणामी झाडाच्या खालच्या बाजूला फुले,शेंगा येण्याचे प्रमाण घटते. सद्या हीच परिस्थिती आहे. 
सोयाबीनच्या एका झाडाला किमान ६० ते ७० शेंगा धरतात परंतु ज्या ठिकाणी सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्या ठिकाणी हे प्रमाणा २० ते २५ शेंगावर येण्याची शक्यता आहे.
 
- कृषी विद्यापीठाची शिफारस 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वाढरोधक संजिवकांची शिफारस केली आहे. पेरणीपासून ४० दिवसाच्या आत ही संजिवके सोयाबीनवर फवारायची आहेत. परंतु सततच्या पावसामुळे शेतकºयांना संजिवकांची फवारणी करता आली नाही.
- अतिरिक्त खते, टॉनिक वापरल्यामुळे सोयाबीनची वाढ होण्यास कारणीभूत ठरते शिवाय दाट पेरणी केल्याने पिकांच्या मुळाशी प्रकाश पोहोचत नाही परिणामी शेंड्यांनी मिळवलेला प्रकाश व अन्नद्रव्यावर मुळाशी असलेली पाने जगतात आणि दाट पेरणीमुळे स्पर्धा वाढल्याने पिके वाढतात.त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. शेगांचे प्रमाण घटते.
- डॉ. योगेश इंगळे, सोयाबीन तज्ज्ञ संशोधक, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र,(डॉ.पदेंकृवि) अमरावती.

 

Web Title: Soya bean grows unrealistic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.