गीतकार वामन रामराव कांत स्मृतिदिन

By Admin | Updated: September 8, 2016 11:02 IST2016-09-08T11:00:57+5:302016-09-08T11:02:11+5:30

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात' असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत यांचा आज स्मृतिदीन.

Songwriter Waman Ramrao Kant Memorial Day | गीतकार वामन रामराव कांत स्मृतिदिन

गीतकार वामन रामराव कांत स्मृतिदिन

>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ८ - 'बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात' असे सर्वांच्या ओठी असलेले  गीत लिहिणारे  ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत यांचा आज स्मृतिदीन.
 
जीवन
वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
 
कारकीर्द
'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)
 
काव्यसंग्रह(एकूण १० )
'दोनुली'
’पहाटतारा’
’बगळ्यांची माळ’
'मरणगंध' (नाट्यकाव्य)'
मावळते शब्द'
'रुद्रवीणा'
'वाजली विजेची टाळी'
'वेलांटी'’शततारका’ (१९५०)
’सहज लिहिता लिहिता’
 
चरित्र
वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -*कविवर्य वा.रा.कांत* - कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
 
 
पुरस्कार
१९६२-६३ वेलांटी या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७७-७८ मरणगंध या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७९-८० दोनुली या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
१९८९-९० मावळते शब्द या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार
 
सन्मान
१९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान
 
८ सप्टेंबर १९९१ साली त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य :  मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Songwriter Waman Ramrao Kant Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.