शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

संजय राऊतांचा अजित पवारांना मोलाचा सल्ला; म्हणाले, "राजकारणात एकमेकांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 21:37 IST

अजित पवारांचा स्वभाव रोखठोक बोलण्याचा आहे. त्यांनी थेट नाव घेतले पाहिजे होते असं राऊत म्हणाले.

मुंबई - अजित पवार आणि संजय राऊत संघर्ष असण्याचं कारण नाही. राजकारणात एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. आघाडीत होतात, तीन पक्ष वेगळे आहेत. प्रत्येक नेत्याची बोलण्याची, वागण्याची, विचार करण्याची क्षमता आणि पद्धत वेगळी आहे. अजितदादांचा, माझा, उद्धव ठाकरेंचा, शरद पवारांचा वेगळा स्वभाव असेल. काही गोष्टी खिलाडू वृत्तीने घ्यायच्या असतात असा मोलाचा सल्ला संजय राऊतांनीअजित पवारांना दिला.  

...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचा स्वभाव रोखठोक बोलण्याचा आहे. त्यांनी थेट नाव घेतले पाहिजे होते. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे. महाविकास आघाडी तुटू नये ही माझ्यावर जबाबदारी आहे. शिवसेना फुटताना आमची बाजू शरद पवार, अजित पवारांनी मांडली होती. मग आम्ही बोललो का तुम्ही का बोलताय? राजकारणात एकमेकांना विश्वास द्यायचा असतो. आम्ही संकटात असताना पवार कुटुंब आमच्या पाठिशी उभे राहिले. शिवसेना कशी फोडली हे सांगत होते असं त्यांनी सांगितले. 

ही नियतीची इच्छाअजित पवारांशी माझा संघर्ष कशासाठी होईल? त्यांच्या राजकारणाशी माझा संबंध नाही. महाराष्ट्रातील आपतधर्म म्हणून आम्ही एकत्र आहोत. ज्या शक्तीविरोधात लढतोय त्याच्यासाठी तिघांनी एकत्रित येऊन लढावे ही नियतीची इच्छा आहे. पवार कुटुंबाचे माझे व्यक्तिगत संबंध वर्षानुवर्षे आहेत. काही रुसवेफुगवे होत असतात. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडणार नाहीत हे मी बोललो, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक फोडण्याचा डाव भाजपा करतेय. ब्लॅकमेल करतेय. आम्ही कायम अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतुक करतो. ते लोकप्रिय नेते आहेत. संघर्षाचा संबंध येतो कुठे? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. 

वेगळा निर्णय घेतला पाहिजे ही NCP आमदारांची भूमिकाआमच्या काही लोकांवर दबाव आहे. परंतु पक्ष भाजपासोबत जाऊ शकत नाही. हे शक्य नाही. काहींना प्रचंड त्रास होतोय, कुटुंबाला मनस्ताप होतोय, मुलं, सूना, नातवंडांना त्रास होतोय, त्यांना वारंवार चौकशीला बोलावले जातेय. लोकांचे मानसिक खच्चीकरण होतेय. त्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. आपण एक निर्णय घेतला पाहिजे आणि हा त्रास थांबवला पाहिजे. पक्ष म्हणून निर्णय घेऊया असं सहकाऱ्यांनी पवारांना सांगितले. त्यावर आपण एकत्र लढूया, २०२४ नंतर हा त्रास संपेल असं पवारांनी सहकाऱ्यांना म्हटलं, त्याचसोबत तरी या त्रासाचा कडेलोट होत असेल तर, कुटुंब भरडली जात असतील त्यातून तुम्ही काय निर्णय घेणार असाल तर हा तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे. पक्ष तुमच्या निर्णयात सहभागी नसेल अशी भूमिका पक्षप्रमुख पवारांनी घेतली त्याचे स्वागत आहे असं विधान संजय राऊतांनी उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीतील तपशीलावर केले.  

राहुल गांधी-उद्धव ठाकरेंमध्ये होईल भेटराहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट व्हावी यावर केसी वेणुगोपाल यांच्या बैठकीत एकमत आहे. पुढील काळात राहुल गांधी मुंबई, महाराष्ट्रात आले तर नक्कीच उद्धव ठाकरेंसोबत भेट होईल. उद्धव ठाकरेंना दिल्लीचे फार आकर्षण आहे. जे बाळासाहेब ठाकरेंनाही कधी नव्हते असं राऊतांनी म्हटलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवार