शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:07 IST

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, ते जरी सांगितले असते तर बरे झाले असते. कॅबिनेट बैठकीत काही वक्तव्ये माझ्या आणि भुजबळ यांच्याकडून आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विसंगत वक्तव्ये करु नये असे सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे आणि घडलेले आहे तेच बोला. खेळीमेळीत चर्चा झाली, मी आता जे बोललो तेवढेच घडल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळात गँगवॉरसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. शिवाय एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले आहे. यावरून मुश्रीफांनी राऊतांना सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले असताना शंभुराज देसाई देखील आता समोर आले आहेत. 

राऊतांचे खबरे त्यांना अडचणीत आणतील, चार टर्म खासदार असे बोलतो हे आम्हाला आश्चर्य वाटते. राऊत सिद्ध करु शकले तर राजीनामा देऊ असे मुश्रीफ बोलले, मी देखील त्यांच्याशी सहमत आहे. राऊतांना काम करणे नीट जमते, त्यांना तेच काम दिलेले आहे. जे घडले नाही ते भासवले जातेय. राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असेही देसाई म्हणाले. 

गेल्या दीड दोन वर्षात कोणाला त्यांनी चांगले म्हटलेय का? बाकी सगळेच वाईट, विश्वज्ञानी मी एकटाच अशी त्यांची मानसिकता आहे. आयोग, न्यायालये स्वायत्त असतात हे त्यांना कळले पाहिजे, असे देसाई म्हणाले. 

गेले वर्षभर आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. माध्यमांसमोर ते बोलायचं नसते. ग्रामपंचायतीत आम्हाला अधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचा कल कोणत्या बाजूनं आहे हे कळले आहे.  कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अडीज वर्ष आम्ही हेच म्हणत होतो, काही ना काही निमित्त का होईना ते बाहेर पडतायत, असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावर लगावला. याचबरोबर ज्याच्याकडे पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे या शाखा राहतील, असेही देसाई म्हणाले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईChagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षण