शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:07 IST

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, ते जरी सांगितले असते तर बरे झाले असते. कॅबिनेट बैठकीत काही वक्तव्ये माझ्या आणि भुजबळ यांच्याकडून आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विसंगत वक्तव्ये करु नये असे सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे आणि घडलेले आहे तेच बोला. खेळीमेळीत चर्चा झाली, मी आता जे बोललो तेवढेच घडल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळात गँगवॉरसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. शिवाय एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले आहे. यावरून मुश्रीफांनी राऊतांना सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले असताना शंभुराज देसाई देखील आता समोर आले आहेत. 

राऊतांचे खबरे त्यांना अडचणीत आणतील, चार टर्म खासदार असे बोलतो हे आम्हाला आश्चर्य वाटते. राऊत सिद्ध करु शकले तर राजीनामा देऊ असे मुश्रीफ बोलले, मी देखील त्यांच्याशी सहमत आहे. राऊतांना काम करणे नीट जमते, त्यांना तेच काम दिलेले आहे. जे घडले नाही ते भासवले जातेय. राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असेही देसाई म्हणाले. 

गेल्या दीड दोन वर्षात कोणाला त्यांनी चांगले म्हटलेय का? बाकी सगळेच वाईट, विश्वज्ञानी मी एकटाच अशी त्यांची मानसिकता आहे. आयोग, न्यायालये स्वायत्त असतात हे त्यांना कळले पाहिजे, असे देसाई म्हणाले. 

गेले वर्षभर आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. माध्यमांसमोर ते बोलायचं नसते. ग्रामपंचायतीत आम्हाला अधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचा कल कोणत्या बाजूनं आहे हे कळले आहे.  कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अडीज वर्ष आम्ही हेच म्हणत होतो, काही ना काही निमित्त का होईना ते बाहेर पडतायत, असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावर लगावला. याचबरोबर ज्याच्याकडे पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे या शाखा राहतील, असेही देसाई म्हणाले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईChagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षण