शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Exclusive: कारखान्यांमधील  स्फोटांचं मूळ सापडलं; सरकारच्या 'या' धोरणाचा अतिरेक ठरतोय घातक!

By यदू जोशी | Updated: August 31, 2019 12:43 IST

...अन् सुरक्षेच्या यंत्रणा अनेक कारखान्यांमधून झाल्या बेपत्ता!

ठळक मुद्देईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत उद्योगांसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या कमी करण्यात आल्या.'ईझ ऑफ डुईंग बिझनेस'चा अतिरेक घातक ठरत असल्याचं दिसतंय.

>> यदु जोशी 

मुंबई- राज्यामध्ये गेल्या काही वर्षात कारखान्यांमधील स्फोटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याच्या मुळाशी सरकारच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेसचा अतिरेक असल्याचे समोर येत आहे.

कारखान्यांची उभारणी करण्यासाठी आणि कारखान्यांच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांची संख्या कमी करून इंडस्ट्री फ्रेंडली वातावरण तयार करण्याचा विद्यमान राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ईझ ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना राबवण्यात आली. त्याअंतर्गत उद्योगांसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या कमी करण्यात आल्या. विविध प्रकारच्या परवान्यांसाठी उद्योजकांना सरकारचे उंबरे झिजवावे लागू नयेत म्हणून ही संकल्पना आणली गेली पण काही बाबतीत आता अतिरेक होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

ईझ ऑफ डुईंग बिझनेस आणण्यापूर्वी प्रत्येक कारखान्याला तेथील अग्निशमन यंत्रणेसह सुरक्षेच्या विविध उपाययोजना  नियमानुसार आहेत की नाही याची याचे प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी घ्यावे लागायचे.  एमआयडीसीची यंत्रणा हे प्रमाणपत्र कारखान्याची तपासणी करून देत असे. मात्र ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत असे प्रमाणपत्र कारखान्यांनी  घेण्याची अट रद्द करण्यात आली आणि "आमच्या कारखान्यात  सुरक्षेच्या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत असे कारखान्यांनी स्वयंप्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे अशी मुभा देण्यात आली. त्यामुळेच कारखान्यांमधील स्फोटांची संख्या वाढताना दिसत आहे. 

कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना करणारी यंत्रणा ही खर्चिक आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्यात टाळाटाळ करतात. आता प्रमाणपत्राची अटच न राहिल्याने अनेक कारखान्यांनी अशी यंत्रणा उभी करण्याचे सोडून दिले आणि थातुरमातुर उपाययोजना केल्या व आमच्याकडील सुरक्षा यंत्रणा भक्कम आहे असे लिहून दिले. त्यामुळे स्फोटासारख्या दुर्घटना घडू नयेत म्हणून करावयाच्या उपाययोजना आणि दुर्घटना घडल्यानंतर त्यावर वेळीच नियंत्रण आणण्याची यंत्रणा अनेक कारखान्यांमधून बेपत्ता झाली आहे.----------------------------------------

ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत कारखान्यांमधील सुरक्षा  उपाययोजनांबाबत स्वयंप्रतिज्ञापत्राची मुभा देणे चुकीचेच होते असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज लोकमतशी बोलताना मान्य केले. ते म्हणाले की की अलीकडच्या काळात कारखान्यांमधील स्फोट आणि त्यात घडणारे मृत्यू यांची संख्या वाढत आहे. असे का घडते याच्या मुळाशी गेल्यानंतर आमच्या ते लक्षात आले.   आता पूर्वीचीच अट लागू केली जाईल. सुरक्षिततेच्या उपाययोजनांची नियमितपणे तपासणी केली जाईल आणि अशा दुर्घटना टाळल्या जातील.

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूरbusinessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्र