शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'काही लोकांना शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद लावायचा आहे', उदय सामंतांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 09:01 IST

Eknath Shinde Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सरकारमध्ये शीत युद्ध सुरू असल्याची चर्चा होत आहे.

Maharashtra News: महायुती सरकार स्थिर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा घेतलेला निर्णय आणि एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष याने या चर्चेला हवा दिला. पण, शिंदेंनी असेही काही नसल्याचे सांगत सर्व चर्चा फेटाळून लावल्या. आता यावर उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेत उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कोकणातील आणखी काही नेते शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यात वैभव नाईक याचेही नाव चर्चेत आहे. चर्चेबद्दल भाष्य करताना उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही लोकांना वाद लावायचा आहे, असे म्हटले आहे. 

उदय सामंत काय बोलले?

"काही लोकांना देवेंद्रजींमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद लावायचा आहे. तसा प्रयत्न ते करताहेत. पण ते परिपक्व राजकारणी आहेत. अशा भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. असा कोणी जर वाद लावत असेल आणि त्यांना वाटत असेल की, वाद लागेल, तर त्यांचे मनसुबे उधळून टाकणार ते दोन नेते आहेत", असे उदय सामंत म्हणाले. 

ना कोल्ड वॉर, ना हॉट वॉर

उदय सामंत म्हणाले, "कोल्ड वॉर नाहीये. हॉट वॉर नाहीये. कसलेही वॉर नाहीये. अतिशय समन्वयाने महायुतीचे सरकार वेगाने काम करत आहेत."

वैभव नाईकांबद्दल उदय सामंतांचं भाष्य

"वैभव नाईक हे थेट शिंदे साहेबांच्या संपर्कात असतील, तर मला हे माहिती नाही. पण, माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. ते माझे महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. त्यांनी तसा निर्णय घेतला, तर निलेश राणेंना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. पण, तिथे आता आमदार निलेश राणे आहेत. यासंदर्भात निलेश राणे यांच्याशी देखील चर्चा करावी लागणार आहे", असे उदय सामंत यांनी सांगितले. 

टॅग्स :MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत