शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

'काही लोकांना शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद लावायचा आहे', उदय सामंतांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 09:01 IST

Eknath Shinde Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सरकारमध्ये शीत युद्ध सुरू असल्याची चर्चा होत आहे.

Maharashtra News: महायुती सरकार स्थिर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा घेतलेला निर्णय आणि एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष याने या चर्चेला हवा दिला. पण, शिंदेंनी असेही काही नसल्याचे सांगत सर्व चर्चा फेटाळून लावल्या. आता यावर उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेत उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कोकणातील आणखी काही नेते शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यात वैभव नाईक याचेही नाव चर्चेत आहे. चर्चेबद्दल भाष्य करताना उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही लोकांना वाद लावायचा आहे, असे म्हटले आहे. 

उदय सामंत काय बोलले?

"काही लोकांना देवेंद्रजींमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद लावायचा आहे. तसा प्रयत्न ते करताहेत. पण ते परिपक्व राजकारणी आहेत. अशा भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. असा कोणी जर वाद लावत असेल आणि त्यांना वाटत असेल की, वाद लागेल, तर त्यांचे मनसुबे उधळून टाकणार ते दोन नेते आहेत", असे उदय सामंत म्हणाले. 

ना कोल्ड वॉर, ना हॉट वॉर

उदय सामंत म्हणाले, "कोल्ड वॉर नाहीये. हॉट वॉर नाहीये. कसलेही वॉर नाहीये. अतिशय समन्वयाने महायुतीचे सरकार वेगाने काम करत आहेत."

वैभव नाईकांबद्दल उदय सामंतांचं भाष्य

"वैभव नाईक हे थेट शिंदे साहेबांच्या संपर्कात असतील, तर मला हे माहिती नाही. पण, माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. ते माझे महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. त्यांनी तसा निर्णय घेतला, तर निलेश राणेंना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. पण, तिथे आता आमदार निलेश राणे आहेत. यासंदर्भात निलेश राणे यांच्याशी देखील चर्चा करावी लागणार आहे", असे उदय सामंत यांनी सांगितले. 

टॅग्स :MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत