शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

'काही लोकांना शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद लावायचा आहे', उदय सामंतांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 09:01 IST

Eknath Shinde Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सरकारमध्ये शीत युद्ध सुरू असल्याची चर्चा होत आहे.

Maharashtra News: महायुती सरकार स्थिर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा घेतलेला निर्णय आणि एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष याने या चर्चेला हवा दिला. पण, शिंदेंनी असेही काही नसल्याचे सांगत सर्व चर्चा फेटाळून लावल्या. आता यावर उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेत उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कोकणातील आणखी काही नेते शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यात वैभव नाईक याचेही नाव चर्चेत आहे. चर्चेबद्दल भाष्य करताना उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही लोकांना वाद लावायचा आहे, असे म्हटले आहे. 

उदय सामंत काय बोलले?

"काही लोकांना देवेंद्रजींमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद लावायचा आहे. तसा प्रयत्न ते करताहेत. पण ते परिपक्व राजकारणी आहेत. अशा भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. असा कोणी जर वाद लावत असेल आणि त्यांना वाटत असेल की, वाद लागेल, तर त्यांचे मनसुबे उधळून टाकणार ते दोन नेते आहेत", असे उदय सामंत म्हणाले. 

ना कोल्ड वॉर, ना हॉट वॉर

उदय सामंत म्हणाले, "कोल्ड वॉर नाहीये. हॉट वॉर नाहीये. कसलेही वॉर नाहीये. अतिशय समन्वयाने महायुतीचे सरकार वेगाने काम करत आहेत."

वैभव नाईकांबद्दल उदय सामंतांचं भाष्य

"वैभव नाईक हे थेट शिंदे साहेबांच्या संपर्कात असतील, तर मला हे माहिती नाही. पण, माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. ते माझे महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. त्यांनी तसा निर्णय घेतला, तर निलेश राणेंना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. पण, तिथे आता आमदार निलेश राणे आहेत. यासंदर्भात निलेश राणे यांच्याशी देखील चर्चा करावी लागणार आहे", असे उदय सामंत यांनी सांगितले. 

टॅग्स :MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत