शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रश्न सोडवा, बडगे दाखवू नका; उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 20:10 IST

महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केली.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केली.सातव्या वेतन आयोगाबरोबरच इतर अनेक मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. आधीच मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांचे  त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलने सुरू आहेत. त्यात आता राज्य सरकारी कर्मचारीही संपावर गेल्याने महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे अशी चिंता व्यक्त करून शिवसेना पक्षप्रमुखांनी पुढे स्पष्ट केले की, ‘‘सर्वच राज्यकर्त्यांच्या निवडणूक जुमलेबाजीचे हे परिणाम आहेत. ‘गरीब हटाव’पासून ‘अच्छे दिन’च्या घोषणा पूर्ण झाल्या असत्या तर लोकांच्या असंतोषाचा असा भडका आज उडाला नसता. सत्तेवर येण्यासाठी ‘थापा’ मारल्या गेल्या, लोकांना फसवले गेले, त्याचेच परिणाम सगळे भोगत आहेत. देश अशा जुमलेबाजीमुळे खड्डय़ात गेला आहे असा घणाघात करून उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘‘महाराष्ट्रात आज शेतकरी व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. त्याला आंदोलन न समजता न्याय्य हक्कांचा लढा मानायला हवा. रोजगार, रोजीरोटी या न्याय्य हक्कांसाठीही लोकांना रस्त्यावर उतरावे लागत असेल तर हा देश भविष्यात नक्की कोणत्या दिशेने जाईल ते सांगता येत नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यासाठीच या लोकांचे प्रश्न सहानुभूतीने, न्याय्य हक्कांचे म्हणून सोडवायला हवेत.सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही रस्त्यावर उतरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी रास्तच आहे असे सांगून उद्धव ठाकरे यांनी ठणकावले की, त्यांचा संप चिघळण्याआधीच मिटवा. तुमचे ते कारवाईचे बडगे व दंडुके सध्या लांबच ठेवा. ही सर्व महाराष्ट्राचीच जनता आहे. मंत्रालयात ‘राज्यकर्ते’ हे ‘टेम्पररी’ आहेत. सरकारी कर्मचारी कायम आहेत. म्हणूनच त्यांच्या मागण्यांचा विचार करा आणि तुमच्या जुमलेबाजीस एकदाचा पूर्णविराम द्या. कारण तुमचा तो निवडणूक आयोग आणि न्यायालयही जुमलेबाजीस ‘फटके’ देत आहे, असेही शेवटी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र