शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘लोकमत’च्या दणक्याने सामाजिक ‘अ’न्याय दूर, राज्यातील मागास विद्यार्थ्यांना दिलासा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 06:01 IST

राज्यातील ४३५ वसतिगृहांमधील ४५ हजार मागास विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्यावर गदा आणणारा आदेश मागे घेण्याची भूमिका सामाजिक न्याय विभागाने आज ‘लोकमत’च्या दणक्यानंतर घेतली.

मुंबई  - राज्यातील ४३५ वसतिगृहांमधील ४५ हजार मागास विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्यावर गदा आणणारा आदेश मागे घेण्याची भूमिका सामाजिक न्याय विभागाने आज ‘लोकमत’च्या दणक्यानंतर घेतली. पुरवठादारांची देयके तत्काळ देण्यात येणार आहेत.‘मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ठेवणार उपाशी’ हे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले. त्याची तत्काळ दखल घेत, नवा आदेश जारी करीत असल्याचे समाज कल्याण आयुक्तालयाचे सहआयुक्त माधव वैद्य यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एप्रिल २०१८ नंतर पुरविलेल्या भोजनाची देयके देऊ नयेत, हा आधीचा आदेश आता मागे घेण्यात येणार आहे.भोजन पुरवठादारांच्या देयकांचे प्रस्ताव प्रत्येक जिल्हा कार्यालयाने पाठवावेत, त्यांचा पैसा तत्काळ दिला जाईल. नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राट दिले जाईपर्यंत आधीच्या पुरवठादारांकडील काम कायम ठेवले जाईल, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. नवीन निविदांबाबत धक्कादायक माहिती दरम्यान हाती आली आहे. भोजन पुरवठ्याची आॅनलाइन निविदा १० जानेवारी २०१८ रोजी काढण्यात आली होती. आज आठ महिने झाले, तरी प्रक्रिया पूर्ण करून नवीन कंत्राट देण्यात आलेले नाही. आधीच्या पुरवठादरांना काम मिळत राहावे, म्हणून हा विलंब मुद्दाम केला जात असल्याचे म्हटले जाते.‘मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार ठेवणार उपाशी’ हे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर, सरकारने पुरवठादारांचे देयके तत्काळ देण्याची तयारी दर्शविली.

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र