शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सामाजिक बहिष्कार ठरेल अपराध

By admin | Published: July 13, 2017 4:41 AM

समूह तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावरील सामाजिक बहिष्काराला बंदी घालणारा कायदा ३ जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात अंमलात आला

धर्मराज हल्लाळे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : एखादी व्यक्ती वा व्यक्तींचा समूह तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावरील सामाजिक बहिष्काराला बंदी घालणारा कायदा ३ जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात अंमलात आला आहे. जादूटोणा विरोधी विधेयकानंतर सामाजिक बहिष्कारासंदर्भात अस्तित्वात आलेल्या दुसऱ्या सामाजिक सुधारणेच्या कायद्याने अंनिसच्या लढ्याला यश मिळाल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी दिली. सामाजिक बहिष्कारावर बंदी आणण्याकरिता महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्याला २० जून २०१७ रोजी राष्ट्रपतींनी संमती दिली असून, ३ जुलै रोजी सदर अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा कायदा ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध बंदी व निवारण) अधिनियम २०१६’ या नावाने ओळखला जाईल. जातपंचायत व अन्य माध्यमातून सामाजिक बहिष्कारामुळे व्यक्ती वा समुहाच्या मूलभूत अधिकारांचे हनन होते. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी प्रदीर्घ लढा दिला. नाशिकमध्ये जातपंचायतीचे प्रकरण समोर आल्यानंतर डॉ. दाभोळकर यांनी ८ आॅगस्ट २०१३ रोजी जातपंचायतीच्या विरोधात परिषद घेतली होती. त्यानंतर १५ आॅगस्ट रोजी लातूर येथे परिषद झाली. आता सामाजिक बहिष्कार बंदी कायद्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नियुक्त होतील, असेही प्रधान सचिव बावगे यांनी सांगितले. सदर अधिकारी सामाजिक बहिष्कार अपराधांचा शोध घेतील. भादंवि कलम ३४, १२० (क), १२० (ख), १४९, १५३ (क), ३८३ ते ३८९ तसेच ५११ अन्वये अपराध सिद्ध झाल्यास दोषारोपपत्र दाखल होईल. >समाजातून वाळीत टाकण्याला बसणार प्रतिबंध समाजातील कोणत्याही सदस्याला सामाजिक, धार्मिक, सामूहिक कार्यक्रम तसेच समाज मेळाव्यात प्रतिबंध करणे, विवाह, अंत्यविधी वा इतर विधी संस्कार पार पाडण्यासाठी समाजातील सदस्याचा हक्क नाकारणे, कोणत्याही कारणावरून वाळीत टाकण्याची व्यवस्था करणे, समाजातील व्यक्तीचे व्यावसायिक तसेच व्यापारविषयक संबंध तोडण्यासाठी प्रवृत्त करणे, समाजातून काढून टाकण्याची व्यवस्था करणे अशी अनेक कृत्ये सामाजिक बहिष्कार बंदी कायद्याअंतर्गत अपराध ठरतील.>भादंवि कलम ३४, १२० (क), १२० (ख), १४९, १५३ (क), ३८३ ते ३८९ तसेच ५११ अन्वये अपराध सिद्ध झाल्यास दोषारोपपत्र दाखल होणार असून त्यानंतर त्याचा खटला चालेल.