शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

...म्हणून ‘सुपर फूड’ ज्वारी खायलाच हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:56 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून हृदयविकारापर्यंतच्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी वरदान ठरू शकते. त्यामुळे या ‘सुपर फूड’चा आहारात समावेश करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात.

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक - महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत ६०-७० च्या दशकात महत्त्वाचे स्थान असलेल्या ज्वारीचा आता शहरी भागात काही प्रमाणात पुन्हा आहारात समावेश होऊ लागला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून हृदयविकारापर्यंतच्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी वरदान ठरू शकते. त्यामुळे या ‘सुपर फूड’चा आहारात समावेश करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात.

ज्वारीचा इतिहास रंजक आहे. साधारण पाच हजार वर्षांपासून ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीचा उगम आफ्रिकेत झाला. तेथून ती भारत, चीनमध्ये आली. अमेरिका आफ्रिकेतून गुलामांचा व्यापार करायची. गुलामांबरोबर ज्वारीही अमेरिकेत पोहोचली. गरिबांचे मुख्य अन्न म्हणून एकेकाळी ज्वारीकडे पाहिले जायचे. मात्र रेशनवर गहू, तांदूळ यांचा पुरवठा सुरू झाल्याने आहारातील ज्वारीचे स्थान कमी झाले. १९६० पर्यंत महाराष्ट्रात सुमारे ६२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप व रब्बी ज्वारीचे उत्पादन घेतले जायचे. १९८० पर्यंत मोठ्या प्रमाणात ज्वारीची शेती होती. मात्र त्यानंतर विशेषत: जागतिकीकरणानंतर ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने कमी होत गेले. गेल्या ५० वर्षांत ज्वारीचे क्षेत्र घटून ते १७ लाख ४० हजार हेक्टरवर आले आहे. वाढता खर्च आणि २० ते ३० रुपये प्रतिकिलोच्या पुढे भाव मिळत नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळले. शेतकरी आता केवळ रब्बी ज्वारीला पसंती देतात.

१. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे आहेत, त्यामुळे हाडांची मजबुती वाढणे, रक्त वाढवण्यासाठी ती उपयोगी आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी ती आरोग्यवर्धक आहे.

२. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. ते पचण्यासाठी, पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.

३. पोटामध्ये चांगल्या बॅक्टेरियाची निर्मिती करते. ज्वारी खाण्याने आपले मानसिक आरोग्यही चांगले राहते. 

गोदावरी नदी आणि ज्वारीमराठवाड्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांना ‘गंगाथडी’ म्हटले जायचे. हा परिसर ज्वारीसाठी प्रसिद्ध होता. मात्र ज्वारीच्या भावाचे गणित बिघडल्याने येथील काही शेतकरी आता सोयाबीन तसेच उसाच्या पिकाकडे वळले आहेत. ज्वारीचे पीक कोकण वगळता  विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात घेतले जाते. पावसानंतर ओलसर जमिनीत रब्बीचे पीक चांगले येते. 

ज्वारीचे अर्थकारणशेतकऱ्यांच्या ज्वारीला कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा स्थानिक बाजारात केवळ २० ते ३० रुपये किलो भाव मिळतो. मात्र शहरात ग्राहकाला ज्वारी ६० रुपये किलोने घ्यावी लागते. ज्वारीच्या काढणीसाठी मजुरांचा खर्च आता वाढला आहे. त्यामुळे भावाअभावी हे पीक शेतकऱ्यांना परवडत नाही.

ज्वारीमुळे शरीरातील चरबी, साखर नियंत्रणात राहते. मधुमेही, उच्च रक्तदाब, अधिक वजनाच्या व्यक्ती, थायराॅइडचे रुग्ण यांच्यासाठी ज्वारी फायदेशीर आहे. मुख्यत्वे ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. मात्र ज्वारीपासून घावन, धिरडे, इडली, खिचडी किंवा गूळ घातलेली पेज केली जाते.   डॉ. शीतल नागरे, आहारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे. 

ज्वारीचे कोठार सोलापूरसोलापूरला ‘ज्वारीचे कोठार’ म्हटले जाते. मात्र तेथेही आता ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. मालदांडी ज्वारीला ४० ते ५० रुपये किलो भाव मिळतो.संयुक्त राष्ट्र महासभेने २०२३ हे वर्ष ‘ आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ (मिलेट इयर) जाहीर केले. केंद्र सरकारने भरडधान्याचे उत्पादन वाढविण्यापासून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्षात विशेष काही झाले नाही.भरडधान्यांत ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, आदींचा समावेश होतो. हे पीक उष्णकटिबंधीय आहे. यास पाणीही कमी लागते.

१९९० पर्यंत लागवड आणि उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. मात्र इतर नगदी पिकांमध्ये पैसा मिळू लागला. दुसरीकडे, साखर कारखान्यांची संख्या वाढल्याने ज्वारीऐवजी शेतकरी उसाचे पीक घेऊ लागले.  तशी ज्वारीच्या घसरणीची कहाणी सुरू झाली. लागवड, उत्पादन, बाजारभाव, प्रक्रिया उद्योग आणि साठवण व्यवस्था अशा कोणत्याही बाबतीत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे ज्वारीच्या मूल्य साखळी व्यवस्थेतही घसरण झाली. परिणामी ज्वारीला पर्याय म्हणून हरभरा आणि घेवडा या पिकांचा विचार शेतकरी करत आहेत.  डॉ. सोमिनाथ घोळवे, शेती प्रश्नांचे अभ्यासक 

 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर