शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 10:34 IST

खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसून नेत्यांची मंत्रीपदे ठरलेली नाहीत. मंत्रीपद निश्चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रीपदं द्यायचा हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. यावर अशोक चव्हाणांनी स्वपक्षासह शिवसेनेलाही इशारा दिला आहे. 

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. अनेक नेते पक्षात आहेत, जे चांगले काम करतात. ते निर्णय घेतात आणि आम्ही त्यामागे फरफटत चाललोय असे व्हायला नको. आमचीही मते आहेत, निर्णय प्रक्रीयेत आमचाही आवाज महत्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. 

अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीमंडळात घ्यावे की नाही हा विषय नाहीय. काँग्रेस पक्ष फरफटत जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललेय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे. 

पक्षाची फरफट होऊ नये यामुळे तेवढी काळजी पक्षाच्या नेतृत्वाला घ्यावी लागेल. यामुळे तिन्ही पक्षांमध्ये संतुलन बनेल. पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे ती नीट पार पाडली गेली पाहिजे, यामुळे जुने नवे अशी फळी नीट सांधली गेली पाहिजे, असा इशाराही त्यांनी स्वपक्षाला दिला आहे. आदर्शवर जे व्हायचे ते होईल, न्यायप्रविष्ट विषय आहे, पर्यावरणाचीही अडचण दूर झाली आहे, यामुळे त्याची मला चिंता नाही, असे चव्हाणांनी सांगितले.  

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी