शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

... तर उद्याच चीनमधील 90 भारतीय 'मायदेशी' येतील, पृथ्वीराज बाबांनी करून दाखवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 09:26 IST

लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं.

मुंबई - चीनमध्ये कोरोना वायरसने थैमान घातले असून आत्तापर्यंत 2 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, तेथील अनिवासी नागरिकांना त्यांच्या देशाकडून मायदेशी नेण्यात येत आहे. भारत सरकारनेही चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवले आहे. मात्र, अद्यापही चीनमधील काही महत्वाच्या शहरांमध्ये भारतीय नागरिक फसले असून घरवापसी करण्याची विनंती या भारतीयांकडून होत आहे. त्यातच, मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीसोबत फोनवरुन संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले होते. 

लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं. त्यानंतर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. तसेच, देशपातळीवर आणि पराराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क करुन चीनमधील भारतीयांचा विश्वास वाढवला. आता, या सर्व भारतीयांसाठी गुडन्यूज आहे. कारण, लवकरच ते मायदेशी परतणार आहेत.  

Video : चीनमध्ये अडकलेल्या अश्विनीला पृथ्वीराज 'बाबांचा' व्हॉट्सअप कॉल

''चीनमधील वुहान शहरात जवळपास 90 भारतीय अडकले आहेत त्यामधील 8 लोक हे महाराष्ट्रीय आहेत. मी त्या 8 ही जणांशी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांशी सुद्धा फोनवरून चर्चा केली. अडकलेल्या भारतीयांना भारतात परत येण्याची इच्छा आहे व तसे भारतीय दुतावासाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. तसेच, चीनमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चीन सरकारकडून उद्या भारतीय वायुदलाचे विमान उतरविण्यास जर परवानगी मिळाली तर भारतीय वायुदलाचे एक विमान उद्या चीनकडे रवाना होईल. आपले सर्व भारतीय सुरक्षितरित्या भारतात परत यावेत, यासाठी मी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त करतो, असेही चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे. 

मोदीजी, आम्हालाही 'एअरलिफ्ट' करा; वुहानमध्ये अडकलेल्या मराठमोळ्या तरुणीची साद

दरम्यान, चीनमध्ये अडकलेल्या आणि मूळच्या सातारच्या अश्विनी पाटील यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण व्हॉट्सअप कॉलद्वारे यांनी संपर्क साधून संवाद साधला होता. अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांना आश्वासक धीर देत चीनमधील भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांना मुंबईत आणण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका फोन कॉलने अश्विनीला मोठा धीर मिळाला आहे. विशेष म्हणजे, पर्यायी पासपोर्टचीही व्यवस्था होईल, यादरम्यान कोणतीही अडचण आली तर डायरेक्ट संपर्क साधण्याचही चव्हाण यांनी अश्विनीला दिला होतं. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSatara areaसातारा परिसरcorona virusकोरोनाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय