शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

"...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन, भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी! पण..."; संजय राऊतांचा EC ला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:23 IST

संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नव-नवे मुद्दे उपस्थित करत आपापल्या विरोधकांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता, "कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?" असा प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला विचारल आहे. एवढेच नाही, तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अॅक्शन व्हायला हवी, असेही राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत? -संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सर्व लवा-जमा घेऊन पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांचे सरकारी स्पेशल फ्लाइट, मग त्याला फोर्स-1 म्हणा, नाही तर फोर्स- 2 म्हणा. सरकारी खर्चाने आणि सरकारी यंत्रेणेसह निवडणूक प्रचार करत आहेत. 

...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन -आता मुंबईत येतील (नरेंद्र मोदी) 10 जनसभा घेतील. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, कुणी मंत्री नसतो. तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी. मात्र असे होणार नाही. नोटीस जाईल, काँग्रेसला, शिवसेनेला, तृणमूल काँग्रेसला, पण नरेंद्र मोदींना जाणार नाही. ही देशाची लोकशाही आहे.

मुंबई करांनी आपल्याला मते का द्यावीत? ज्या पद्धतीने आपण धारावी अदानींना विकली, ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला. "आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही," असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४