शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

"...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन, भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी! पण..."; संजय राऊतांचा EC ला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:23 IST

संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नव-नवे मुद्दे उपस्थित करत आपापल्या विरोधकांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता, "कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?" असा प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला विचारल आहे. एवढेच नाही, तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अॅक्शन व्हायला हवी, असेही राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत? -संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सर्व लवा-जमा घेऊन पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांचे सरकारी स्पेशल फ्लाइट, मग त्याला फोर्स-1 म्हणा, नाही तर फोर्स- 2 म्हणा. सरकारी खर्चाने आणि सरकारी यंत्रेणेसह निवडणूक प्रचार करत आहेत. 

...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन -आता मुंबईत येतील (नरेंद्र मोदी) 10 जनसभा घेतील. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, कुणी मंत्री नसतो. तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी. मात्र असे होणार नाही. नोटीस जाईल, काँग्रेसला, शिवसेनेला, तृणमूल काँग्रेसला, पण नरेंद्र मोदींना जाणार नाही. ही देशाची लोकशाही आहे.

मुंबई करांनी आपल्याला मते का द्यावीत? ज्या पद्धतीने आपण धारावी अदानींना विकली, ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला. "आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही," असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४