शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

'...म्हणून 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करावी लागली', परिवहन मंत्री सरनाईकांनी सांगितले कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:03 IST

ST Ticket Price Hike News: राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. यामागील कारणांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. 

ST Bus Fare hike: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागला आहे. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के इतकी वाढ करण्यात आली असून, शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्रीपासून लागू होणार आहे. पण, इतकी मोठी भाडेवाड राज्य सरकारला का करावी लागली, याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "काल (२३ जानेवारी) प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव या तिघांच्या समितीची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, एसटीची भाडेवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ती १४.९७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे."

'प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित, पण...', सरनाईकांनी दिली माहिती

"रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, ती ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत चालले आहेत. प्रत्येक वर्षी खरंतर ही भाडेवाढ अपेक्षित असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून ही करण्यात आलेली नसल्या कारणाने ही एकत्रित १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ती आजपासून लागू होईल", अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

"एसटी महामंडळाची परिस्थिती आज काही चांगली नाहीये. एसटीचे उत्पन्न आहे, त्यापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे दिवसाला तीन कोटी रुपयांचं नुकसान एसटी महामंडळाला होतं. त्यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना सुविधा द्यायच्या असतील, तर या गोष्टीची गरज असणार आहे. कारण दिवसेंदिवस डिझेल, सीएनजी आणि बसची दुरूस्तीचा खर्च वाढू लागला आहे", असेही सरनाईक म्हणाले. 

मी बैठकीत दरवर्षी भाडेवाढीचं सूचना केली होती -सरनाईक

'मी जेव्हा परिवहन खात्याची बैठक घेतली. त्यावेळी हेच सूचवलं होतं की, एकत्रितपणे भाडेवाढ करण्याऐवजी जर दरवर्षाला ठराविक भाडेवाढ केली, तर सर्वसामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही. प्रवाशांनाही ते अपेक्षित असेल. आता केलेल्या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचं जे दररोज नुकसान होतं आहे, ते कमी होईल", अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.

टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईकMahayutiमहायुतीMumbaiमुंबई