शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला! केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितली 'राज की बात'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 16:10 IST

एकनाथ खडसे यांनी आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र,ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

ठळक मुद्देबारामती तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा

बारामती : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर बुधवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. भाजपला रामराम केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे बराच वेळ पडसाद उमटत आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आघाडीवर आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भर पडली आहे. त्यांनी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी का दिली यावर भाष्य करतानाच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामागची 'राज की बात' देखील सांगितली आहे. 

केंद्रीय मंत्री आठवले यांनी गुरुवारी( दि. २२) बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. 

आठवले म्हणाले, एकनाथ खडसे यांच्याकडे सध्या आमदारकी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. तेथे त्यांना आमदारकीसह मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच खडसे यांच्याबरोबर भाजपचे १५,१६ आमदार जातील ,असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी आठवले यांनी पुरग्रस्तांना राज्य सरकाने तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्राकडून मदतीसाठी पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह आपण केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले.

राज्यात सोलापूर, सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राची मदत मिळवू. मात्र, राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकारने यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. प्रचंड पावसाने कऱ्हा वागज येथील नदीवरील पूल वाहून गेला आहे. पावसाचे पाणी दलितवस्तीमध्ये घुसल्याने नुकसान झाले. त्याचे लवकरात लवकर पंचनामे होणे आवश्यक आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीRamdas Athawaleरामदास आठवलेeknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण