शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

...म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला! केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितली 'राज की बात'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 16:10 IST

एकनाथ खडसे यांनी आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र,ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

ठळक मुद्देबारामती तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा

बारामती : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर बुधवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. भाजपला रामराम केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे बराच वेळ पडसाद उमटत आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आघाडीवर आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भर पडली आहे. त्यांनी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी का दिली यावर भाष्य करतानाच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामागची 'राज की बात' देखील सांगितली आहे. 

केंद्रीय मंत्री आठवले यांनी गुरुवारी( दि. २२) बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. 

आठवले म्हणाले, एकनाथ खडसे यांच्याकडे सध्या आमदारकी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. तेथे त्यांना आमदारकीसह मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच खडसे यांच्याबरोबर भाजपचे १५,१६ आमदार जातील ,असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी आठवले यांनी पुरग्रस्तांना राज्य सरकाने तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्राकडून मदतीसाठी पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह आपण केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले.

राज्यात सोलापूर, सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राची मदत मिळवू. मात्र, राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकारने यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. प्रचंड पावसाने कऱ्हा वागज येथील नदीवरील पूल वाहून गेला आहे. पावसाचे पाणी दलितवस्तीमध्ये घुसल्याने नुकसान झाले. त्याचे लवकरात लवकर पंचनामे होणे आवश्यक आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीRamdas Athawaleरामदास आठवलेeknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण