शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:28 IST

Bachchu Kadu News: माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

बुलढाणा येथील पातुर्डा येथे शेतकरी हक्क परिषदेत उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना बच्चू कडू यांनी हे विधान केलं. ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत बंद केली गेली. वतनदारीमधून निजामशाही, आदिलशाही चालत असे. ही वतनदारी बंद करण्यात आल्याने छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेले. मात्र यात मुघल बादशाह औरंगजेब याचं नाव बदनाम झालं. राजा असा असावा, त्याने मरण पत्करणे स्वीकारले, पण सासऱ्याला वतन दिले नाही’, असे बच्चू कडू म्हणाले.

यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही कडू यांनी सरकारवर टीकास्र सोडलं. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या हिरव्या रंगात विभागणी केली आहे. शेतकरी हे जातीधर्मात विभागले गेल्याने एकत्र येत नाहीत. जर शेतकरी एकत्र आले तर सरकार एका दिवसात सरळ होईल, असं विधानही त्यांनी केलं. तसेच आत्महत्या करणं हा पर्याय नाही. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं धक्कादायक आवाहनही त्यांनी केलं.

तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही बच्चू कडू यांनी मोठं भाष्य केलं. ते म्हणाले की, राजकारण्यांचे मोर्चे , मेळावे यांना प्रचंड गर्दी असते. पण शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. शरद जोशी हे अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले, पण शेतकऱ्यांनी त्यांचा पराभव केला. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभवही शेतकऱ्यांनीच केला. मलाही शेतकऱ्यांनी पाडलं, कारण मी त्यांच्या जातीत बसलो नाही, असा दावा ही बच्चू कडू यांनी यावेळी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu Claims Sambhaji Maharaj Was Killed by In-Laws

Web Summary : Bachchu Kadu sparked controversy, alleging Chhatrapati Sambhaji Maharaj was killed by his in-laws due to the abolishment of hereditary land rights, not Aurangzeb. He criticized the government for dividing farmers and urged unity. He also lamented his election loss.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्रbuldhanaबुलडाणा