शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
2
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
3
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
4
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
5
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
6
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
7
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
8
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
9
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
10
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
11
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
12
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
13
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
14
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
15
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
16
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
17
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
18
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
19
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
20
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:28 IST

Bachchu Kadu News: माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

बुलढाणा येथील पातुर्डा येथे शेतकरी हक्क परिषदेत उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना बच्चू कडू यांनी हे विधान केलं. ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत बंद केली गेली. वतनदारीमधून निजामशाही, आदिलशाही चालत असे. ही वतनदारी बंद करण्यात आल्याने छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेले. मात्र यात मुघल बादशाह औरंगजेब याचं नाव बदनाम झालं. राजा असा असावा, त्याने मरण पत्करणे स्वीकारले, पण सासऱ्याला वतन दिले नाही’, असे बच्चू कडू म्हणाले.

यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही कडू यांनी सरकारवर टीकास्र सोडलं. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या हिरव्या रंगात विभागणी केली आहे. शेतकरी हे जातीधर्मात विभागले गेल्याने एकत्र येत नाहीत. जर शेतकरी एकत्र आले तर सरकार एका दिवसात सरळ होईल, असं विधानही त्यांनी केलं. तसेच आत्महत्या करणं हा पर्याय नाही. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं धक्कादायक आवाहनही त्यांनी केलं.

तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही बच्चू कडू यांनी मोठं भाष्य केलं. ते म्हणाले की, राजकारण्यांचे मोर्चे , मेळावे यांना प्रचंड गर्दी असते. पण शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. शरद जोशी हे अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले, पण शेतकऱ्यांनी त्यांचा पराभव केला. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभवही शेतकऱ्यांनीच केला. मलाही शेतकऱ्यांनी पाडलं, कारण मी त्यांच्या जातीत बसलो नाही, असा दावा ही बच्चू कडू यांनी यावेळी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu Claims Sambhaji Maharaj Was Killed by In-Laws

Web Summary : Bachchu Kadu sparked controversy, alleging Chhatrapati Sambhaji Maharaj was killed by his in-laws due to the abolishment of hereditary land rights, not Aurangzeb. He criticized the government for dividing farmers and urged unity. He also lamented his election loss.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्रbuldhanaबुलडाणा