शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
5
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
6
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
7
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
8
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
9
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
10
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
11
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
12
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
13
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
14
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
15
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
16
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
17
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
18
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
19
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
20
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
Daily Top 2Weekly Top 5

‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:28 IST

Bachchu Kadu News: माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंगेजब बादशाहचं नाव विनाकारण बदनाम झालं, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

बुलढाणा येथील पातुर्डा येथे शेतकरी हक्क परिषदेत उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना बच्चू कडू यांनी हे विधान केलं. ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत बंद केली गेली. वतनदारीमधून निजामशाही, आदिलशाही चालत असे. ही वतनदारी बंद करण्यात आल्याने छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेले. मात्र यात मुघल बादशाह औरंगजेब याचं नाव बदनाम झालं. राजा असा असावा, त्याने मरण पत्करणे स्वीकारले, पण सासऱ्याला वतन दिले नाही’, असे बच्चू कडू म्हणाले.

यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही कडू यांनी सरकारवर टीकास्र सोडलं. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या हिरव्या रंगात विभागणी केली आहे. शेतकरी हे जातीधर्मात विभागले गेल्याने एकत्र येत नाहीत. जर शेतकरी एकत्र आले तर सरकार एका दिवसात सरळ होईल, असं विधानही त्यांनी केलं. तसेच आत्महत्या करणं हा पर्याय नाही. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं धक्कादायक आवाहनही त्यांनी केलं.

तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही बच्चू कडू यांनी मोठं भाष्य केलं. ते म्हणाले की, राजकारण्यांचे मोर्चे , मेळावे यांना प्रचंड गर्दी असते. पण शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. शरद जोशी हे अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले, पण शेतकऱ्यांनी त्यांचा पराभव केला. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभवही शेतकऱ्यांनीच केला. मलाही शेतकऱ्यांनी पाडलं, कारण मी त्यांच्या जातीत बसलो नाही, असा दावा ही बच्चू कडू यांनी यावेळी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu Claims Sambhaji Maharaj Was Killed by In-Laws

Web Summary : Bachchu Kadu sparked controversy, alleging Chhatrapati Sambhaji Maharaj was killed by his in-laws due to the abolishment of hereditary land rights, not Aurangzeb. He criticized the government for dividing farmers and urged unity. He also lamented his election loss.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्रbuldhanaबुलडाणा