शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 14:57 IST

अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांनी सातत्याच्या जोरावर सर्वांना अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया जिंकल्या. लोकसभेत इराणी अमेठीचे तर नवनीत राणा अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

- रवींद्र देशमुख

मुंबई - कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं तर सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे सातत्य. जे काम करत असाल, त्यात सातत्य ठेवलं तर एक दिवस तुम्हाला यश येतच, याची अनेक उदाहरणे आहेत. या उदाहरणांमध्ये आता नवनिर्वाचित महिला खासदार स्मृती इराणी आणि नवनीत कौर राणा यांचा, समावेश झाला. राजकीय पक्षाची एका विशिष्ट मतदार संघातील अनेक वर्षांची मक्तेदारी या दोघींनी मोडून काढली. त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुका नावावर होणार नाहीत, तर तुमच्या कर्तृत्वावर होणार हेच इराणी आणि नवनीत राणा यांनी दाखवून दिले. हीच बदलत्या राजकारणाची नांदी ठरणार असंच दिसत आहे.

अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांनी सातत्याच्या जोरावर सर्वांना अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया जिंकल्या. लोकसभेत इराणी अमेठीचे तर नवनीत राणा अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

महाराष्ट्राच्या सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनाचा गड असलेला अमरावतीत अशक्यप्राय विजय मिळवला. २०१४ मध्ये आनंदराव अडसुळांनी कडवी झुंज देत पराभूत झाल्यानंतर देखील नवनीत राणा यांनी मतदार संघातील संपर्क कायम ठेवला. पराभवानंतर खचून न जाता नवनीत यांनी पूर्ण ताकतीने मतदार संघातील लोकांच्या समस्या सोडविल्या. सत्ता किंवा कुठलेही पद नसताना त्या नागरिकांच्या अडचणीत वेळोवेळी धावून गेल्या. अखेरीस २०१९ उजडेपर्यंत त्यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. येथील जनतेने दिलेली साथ, यामुळे नवनीत यांनी शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांना अखेरीस पराभूत केले.

स्मृतींचा काँग्रेसच्या मुळाशी घाव

स्मृती इराणी यांची स्टोरी देखील नवनीत राणा यांच्याप्रमाणेच आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीत गांधी घराण्यातील व्यक्तीला पराभूत करणे २०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत स्वप्नवत होते. २०१४ मध्ये राहुल गांधी यांना कडवी झुंज देताना स्मृती इराणी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, भाजप नेतृत्वाने इराणी यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना केंद्रीयमंत्रीपद दिले. मंत्रीपद मिळाल्यानंतर स्मृती इराणी यांनी अमेठी मतदार संघावर अधिक लक्ष केंद्रीत केले. एवढंच काय तर अमेठीत विकासकामे केली. तसेच अडचणीच्या काळात मतदार संघातील लोकांच्या मदतीला धावून गेल्या.

२०१९ निवडणूक येईपर्यंत इराणी यांनी अमेठीतील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. पाच वर्षे अमेठीवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या इराणी यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि पराभवाच्या भितीनेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदार संघ बदलल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. निकालानंतर यात काही प्रमाणात तथ्य आढळून आले. मात्र राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढविणे काँग्रेसची दक्षिण भारतात मुळं मजबूत करण्याची रणनिती होती, हे मान्य करावे लागेल. परंतु, यामुळे इराणी यांच्या विजयाची उंची नक्कीच कमी होणार नाही, हे देखील तितकच खरं आहे. इराणी यांना 'ब्रह्मास्त्र' बनवून भाजपने काँग्रेसच्या मुळावरच घाव घातला.

इराणी यांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर काँग्रेसचा गढ जिंकला. तर नवनीत राणा यांनी शिवसेनेचा अमरावती गड पाडला. दोघीही अभिनय क्षेत्रातून राजकारणात दाखल झाल्या असून लोकसभेत जनतेच्या प्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत. हे लोकशाहीतच शक्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. फरक एवढाच की, स्मृती इराणी सत्ताधारी तर नवनीत राणा विरोधी बाकावर असतील.