शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:12 IST

पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़

- अरुण वाघमोडेअहमदनगर - पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़नगर जिल्हा पोलीस दलाच्या दिलासा सेलकडे वर्षभरात पती-पत्नीच्या वादातून दाखल झालेल्या २२३५ तक्रारींपैकी ९०० जोडप्यांनी स्मार्ट फोन हेच वादाचे कारण असल्याचे नमूद केले आहे़ मोबाइलमुळे काडीमोड झालेल्यांमध्ये नवविवाहित दाम्पत्याचीच संख्या सर्वाधिक आहे़आधी पती, सासू-सासऱ्यांकडून त्रास, हुंड्यासाठी छळ, पतीचेव्यसन, विवाहबाह्य सबंध हे कळीचे मुद्दे असायचे. तेही हल्ली असतात. नाही असे नाही, पण बदलत्या काळात ‘मोबाइल’ आणि सोशल मीडिया’ संसार तुटण्यास कारणीभूत ठरत आहे़दिलासा सेलकडे आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात २२३५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. समुपदेशनातून त्यापैकी ७५४ जोडप्यांचे वाद मिटवण्यात आले, तर ४६६ जणांनी स्वत:हून आपला निर्णय घेण्याचे ठरविले. याखेरीज २१५ प्रकरणे गुन्ह्यांसाठी दखलपात्र ठरली. याशिवाय ८ दाम्पत्यांना दिलासाने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठविले व ७ जोडप्यांनी घटस्फोट घेतला.हीच ‘माझी सवत’पती तासन्तास मोबाइलवर बोलतो, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर व्यग्र असतो. माझ्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवरील मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतात. समजावून सांगितले तर रागावतो. मला व मुलांना वेळ देत नाही. स्वत:चा मोबाइल पाहू देत नाही, पासवर्ड सांगत नाही़ पूर्वीप्रमाणे पे्रम करत नाही, मोबाइल ‘माझी सवत’ आहे, अशा तक्रारी महिलांनी केल्या.तीच असते मोबाइलवरआॅफिसच्या कामासाठी फोनवर बोलावे लागते. व्हॉट्सअ‍ॅप हा व्यवसायाचा भाग आहे़ ती क्षुुल्लक कारणाने कटकट करते़ निष्कारण संशय घेते़ तीच अधिक मोबाइलवर बोलते, ती जुन्या मित्रांच्या संपर्कात आहे. माहेरच्या नातेवाइकांकडे माझी तिने बदनामी केली. घरी असल्याने तिला का हवा स्मार्ट फोन? हिच्यामुळे माझे आयुष्य संपून चालले आहे, अशा पुरुषांच्या तक्रारी आहेत.पती-पत्नींमध्ये मोबाइलमुळे वाद होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे़ मोबाइल हे कारण क्षुल्लक वाटत असले तरी त्यातून सुखी संसार विस्कटलेले दिसतात़- कल्पना चव्हाण,निरीक्षक, दिलासा सेल

टॅग्स :MobileमोबाइलFamilyपरिवार