शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:12 IST

पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़

- अरुण वाघमोडेअहमदनगर - पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़नगर जिल्हा पोलीस दलाच्या दिलासा सेलकडे वर्षभरात पती-पत्नीच्या वादातून दाखल झालेल्या २२३५ तक्रारींपैकी ९०० जोडप्यांनी स्मार्ट फोन हेच वादाचे कारण असल्याचे नमूद केले आहे़ मोबाइलमुळे काडीमोड झालेल्यांमध्ये नवविवाहित दाम्पत्याचीच संख्या सर्वाधिक आहे़आधी पती, सासू-सासऱ्यांकडून त्रास, हुंड्यासाठी छळ, पतीचेव्यसन, विवाहबाह्य सबंध हे कळीचे मुद्दे असायचे. तेही हल्ली असतात. नाही असे नाही, पण बदलत्या काळात ‘मोबाइल’ आणि सोशल मीडिया’ संसार तुटण्यास कारणीभूत ठरत आहे़दिलासा सेलकडे आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात २२३५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. समुपदेशनातून त्यापैकी ७५४ जोडप्यांचे वाद मिटवण्यात आले, तर ४६६ जणांनी स्वत:हून आपला निर्णय घेण्याचे ठरविले. याखेरीज २१५ प्रकरणे गुन्ह्यांसाठी दखलपात्र ठरली. याशिवाय ८ दाम्पत्यांना दिलासाने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठविले व ७ जोडप्यांनी घटस्फोट घेतला.हीच ‘माझी सवत’पती तासन्तास मोबाइलवर बोलतो, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर व्यग्र असतो. माझ्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवरील मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतात. समजावून सांगितले तर रागावतो. मला व मुलांना वेळ देत नाही. स्वत:चा मोबाइल पाहू देत नाही, पासवर्ड सांगत नाही़ पूर्वीप्रमाणे पे्रम करत नाही, मोबाइल ‘माझी सवत’ आहे, अशा तक्रारी महिलांनी केल्या.तीच असते मोबाइलवरआॅफिसच्या कामासाठी फोनवर बोलावे लागते. व्हॉट्सअ‍ॅप हा व्यवसायाचा भाग आहे़ ती क्षुुल्लक कारणाने कटकट करते़ निष्कारण संशय घेते़ तीच अधिक मोबाइलवर बोलते, ती जुन्या मित्रांच्या संपर्कात आहे. माहेरच्या नातेवाइकांकडे माझी तिने बदनामी केली. घरी असल्याने तिला का हवा स्मार्ट फोन? हिच्यामुळे माझे आयुष्य संपून चालले आहे, अशा पुरुषांच्या तक्रारी आहेत.पती-पत्नींमध्ये मोबाइलमुळे वाद होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे़ मोबाइल हे कारण क्षुल्लक वाटत असले तरी त्यातून सुखी संसार विस्कटलेले दिसतात़- कल्पना चव्हाण,निरीक्षक, दिलासा सेल

टॅग्स :MobileमोबाइलFamilyपरिवार