शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

रिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:44 AM

मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़

नांदेड/परभणी : केंद आणि राज्यातील भाजपा सरकार विकासाचा अजेंडा राबवित असताना काही रिकामटेकडी मंडळी समाजात जातीय विष पेरण्याचे काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचेही नाव न घेता केली.लोहा येथे गुरुवारी तीन राष्ट्रीय महामार्गांचा भूमीपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, सरकार विकास कामे करत असताना काही मंडळी जातीयवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न करत आहेत़ मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़ मराठवाड्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती़ मात्र त्याकाळात मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही़ लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे गडकरी म्हणाले.तेव्हा तुम्ही काय केले?परभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला़ त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अरे नालायकांनो, १५ वर्षांत तुम्ही नीट वागला असतात तर या शेतकºयांची अशी अवस्था झाली असती का? ही कोणामुळे अवस्था झाली, याचं एकदातरी उत्तर तुम्ही दिले पाहिजे़ आम्हाला प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गोंधळपरभणी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या महिलांनी शेतकºयांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला़ फडणवीस यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे या मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावत येत होत्या़ पाठोपाठ स्वाभिमानीच्या विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा शर्मिला येवले याही मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावल्या़ काही अंतरावरच त्यांनाही पोलिसांनी रोखले़ शेतकरी स्वत: सरण रचून आत्महत्या करीत आहेत, तुम्ही मात्र इकडे उद्घाटन करीत फिरत आहात, अशा शब्दांत या महिलांनी आपले म्हणणे मांडले. त्यावर सभा संपल्यानंतर तुमचे म्हणणे ऐकून घेऊ, मला अशा घटनांची सवय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र तरीही आंदोलक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी