शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साठ वर्षांची मैत्री : प्रतिष्ठेच्या लढाईत श्रीनिवास पाटील खंबीरपणे पवारांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 17:12 IST

माजी राज्यपाल आणि उदयनराजे यांच्यातील साताऱ्याची लढत रंगतदार होणार आहे. आता उदनयराजे भाजपमध्ये जावूनही आपला करिश्मा कायम राखतात, की शरद पवारांच्या चाणाक्ष चालींसमोर हतबल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रवींद्र देशमुखमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. बालेकिल्ल्यात बसलेल्या या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहे. उदयनराजे यांना शह देण्यासाठी पवारांनी खास मित्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. पाटील देखील या प्रतिष्ठेच्या लढाईत पवारांसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत.

शरद पवार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मैत्री 60 वर्षांपासून आहे. श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत होते. परंतु, 1999 मध्ये पवारांनी पाटील यांना मुंबईला बोलवून राजीनामा देण्यास सांगितले. मी जेव्हा सांगेल तेव्हा राजीनामा द्यायचा असा शब्दच पवारांनी पाटील यांच्याकडून प्रशासकीय सेवेते जाण्यापूर्वी घेतला होता. त्यानुसार पाटील यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर पवारांनी पाटील यांना जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्यास सांगितले. पाटील यांनी तसंच केलं आणि कराडमधून ते तब्बल साडेतीन लाख मतांनी निवडून आले होते. विशेष म्हणजे पवार आणि पाटील यांनी कॉलेज जीवनातच राजकारणात जाण्याचे ठरवले होते.

प्रशासकीय सेवेनंतर पाटील दोन वेळा कराडचे खासदार होते. तसेच त्यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले होते. आता साताऱ्यातून उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार हवा म्हणून राष्ट्रवादीतून पाटील यांचे नाव समोर आले. पाटील यांनी सुरुवातीला उमेदवारीसाठी नकार दिला होता. त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील इच्छूक होते. तशी तयारीही त्यांनी सुरू केली होती. पण उदयनराजे यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटीलच योग्य असल्याचे पवारांना वाटते.

मुळात श्रीनिवास पाटील निवडणूक लढविण्यास उत्सुक नव्हते. परंतु, उदयनराजेंनी पवारांसोबत केलेल्या दगाफटक्याचा बदला घेण्यासाठी पाटील तयार झाल्याचे समजते. श्रीनिवास पाटील 60 वर्षांपासून शरद पवारांसोबत आहेत. त्यांची मैत्रीही सर्वश्रूत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या माळेतील एक-एक मणी गळून पडत असताना बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी मित्र पुन्हा धावून आल्याची चर्चा साताऱ्यात रंगली आहे.

एकूणच माजी राज्यपाल आणि उदयनराजे यांच्यातील साताऱ्याची लढत रंगतदार होणार आहे. आता उदनयराजे भाजपमध्ये जावूनही आपला करिश्मा कायम राखतात, की शरद पवारांच्या चाणाक्ष चालींसमोर हतबल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी सातारा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचे मतदान होणार आहे.