शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Sindhutai Sapkal Emotional Story: ते चाफ्याचे झाड आजही आहे, पण फुलांत खरकटे वेचून खाणारी सिंधुताई हरपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 10:14 IST

Sindhutai Sapkal Passed Away: हजारोंची माय २८२ जावई, ४९ सुना, ३५० मुलाची आई, हाफ टाईम शिकलेली तेही चौथी वरपास आणि २२ देशात फिरून आलेली ही नऊवारी, वयाच्या १२ वर्षी जग संपलं. तेव्हा सुन्न झाले होते.

- नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गुरुजी तुम्ही ज्ञानदाते आहात. तुम्हीच घडवू शकता उद्याचा भारत. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा, विद्येपासून कुणीही वंचित राहू नये, याची तमा बाळगा. परिस्थिती फार गंभीर आहे. माझ्या महाराष्ट्रातील गुरुजींनो, पगारासाठी नव्हे, तर विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यादानाचे काम करा समस्त शिक्षकांना हा मूलमंत्र देणाऱ्या आमच्या माई, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. 

समाजसेवेचा एक अध्याय संपुष्टात आला असला तरी त्यांनी उभारलेली चळवळ सुरू असणार आहे. हजारो अनाथांना आपुलकीची मायेचा आधार देणारी आणि साक्षात ईश्वरी अंश समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांनी ३ सप्टेंबर २०२० रोजी 'लोकमत'शी साधलेला विशेष संवाद कायम स्मरणात राहणार आहे.

प्रेताच्या निखाऱ्यावर भाकरी भाजून खाणारी ती हजारोंची मायहजारोंची माय २८२ जावई, ४९ सुना, ३५० मुलाची आई, हाफ टाईम शिकलेली तेही चौथी वरपास आणि २२ देशात फिरून आलेली ही नऊवारी, वयाच्या १२ वर्षी जग संपलं. तेव्हा सुन्न झाले होते. एकाकी लढा दिला. स्मशानात राहणारी ती, भीक मागणारी ती जळणाऱ्या प्रेताच्या निखान्यावर भाकरी भाजून खाणारी, मोहम्मद रफीचे गाणे खूप आवडायचे. मोहम्मद रफीचे गाणे खूप आवडायचे. रस्त्यावर कुठेही सुरु असले की, थांबून त्यांचे गाणे ऐकायचे. त्या परिस्थितीत गाण्याने कस तरी एकटाईमच खाणं दिलं. आता भाषणातून राशन मिळतं. तेच मुलांना खाऊ घालते. माझ्या एकाही शाळेला अनुदान नसल्याचे सिंधुताई नेहमी सांगायच्या.

वांदिले मास्तरनी पिटलं, कांबळेंनी गोंजारलंशाळेत उशिरा यायचे म्हणून वांदिले गुरुजी खूप मारायचे, तर माझी काही तरी अडचण असेल म्हणून मी उशिरा आले. हे समजून कांबळे गुरुजी मला खूप प्रेम करायचे, हे सांगताना दोन्ही गुरुचेच महत्त्व अधोरेखित करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आई आज हरपली आहे.

खरकटं उचलून खाणारी झाली अनाथांची मायवर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे हे सिंधुताईचे गाव. तेथील उत्तर बुनियादी शाळेत त्या शिकल्या. त्या शाळेतील चाफ्याचे झाड आजही आहे. म्हशी पाण्यात बसल्या की, शाळेत जायचे, मुलाचे खरकटे चाफ्याच्या फुलात वेचून खायचे. लोकांना वाटायचे. त्या फुल वेचत आहेत.

माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला. घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली.- यशोमती ठाकूर, पालकमंत्री

संबंधीत बातम्या... 

 “माझी मुलं कशी आहेत, लेकरांची काळजी घ्या”; अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे अखेरचे शब्द

'नकुशी' ते अनाथांची माय, अनेकांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या माईंचा असा होता खडतर प्रवास

.. तेव्हा व्हील-चेअरवरुन सिंधुताई राजदरबारात गेल्या, राष्ट्रपतीही आले होते धावून

टॅग्स :Sindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळ