शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

"१६ वेळा दगड मारून बाळाची नाळ तोडताना एकच विचार केला की अशी वेळ…," 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 10:06 IST

सिंधुताई सपकाळांनी सांगितली होती 'अशी' आठवण, जे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले.

Sindhutai Sapkal Passed Away: 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर होता. परंतु त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलेल्या एका आठवणीनं सर्वांचेच डोळे पाणावले.

"जगा पुढे जा, पण मागे वळून पाहा. एक लक्षात ठेवा. फुलांच्या पायघड्यांवरुन चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोचणं माहित असतं, वेदना माहित नसतात. या रस्त्यानं चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पाय इतके मजबूत करा की एक दिवस ते काटे तुम्हाला सांगतील सुस्वागतम," असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना सल्ला दिला होता. 

"मी स्मशानात राहणारी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी, भिकाऱ्यांसोबत राहणारी मी, जन्म दिलेल्या बाळाची १६ वेळा दगड मारून नाळ तोडताना एकच विचार केला होता की सिंधुताई सपकाळ अशी वेळ कोणावर येऊ नये आणि आली तर तिच्यासोबत तू असली पाहिजे," अशी आठवणही त्यांनी सांगितली होती. "भूक लागल्यावर दुसऱ्यांच्या भूकेपर्यंत पोहोच म्हणजे तुझी भूक कमी होईल, असाही विचार केला होता," असं त्यांनी सांगितलं होतं.

खंत बाळगू नका जगायला शिका, असा सल्लाही त्यांनी सर्वांना दिला होता. "मी २२ देशांमध्ये जाऊन आले. कधी नऊवारीतली मी २२ देशांत जाईन असं वाटलंही नव्हतं. शिका पुढे जात राहा, पण मागेही वळून पाहात राहा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. गरीबी वाईट असते परंतु गरीबांपर्यंत पोहोचा," असाही सल्ला त्यांनी दिला होता.

टॅग्स :Sindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळMaharashtraमहाराष्ट्र