शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

श्रीरामपूरचे मतदार 'निशाणी' बदलणार की 'उमेदवार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 18:16 IST

गेल्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मेहनत घेणाऱ्या विखेंवर आता युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जवाबदारी असणार आहे.

मुंबई – लोकसभा निवडणुकीत मुलाला उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विखेंच्या भाजपमध्ये येण्याने नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे चिन्हे दिसत आहे. सलग पाच वेळा या मतदारसंघाने काँग्रेसच्या उमेदवाराला विधान सभेत पाठवले आहे. विशेष म्हणजे यात विखेंचा मोठा वाटा समजला जातो. मात्र आता विखे भाजपमध्ये गेले असल्याने यावेळी श्रीरामपूरची जनता 'निशाणी' बदलणार की 'उमदेवार' अशी चर्चा पहायला मिळत आहे.

भाजपमध्ये गेलेल्या विखेंकडे विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील युतीची जवाबदारी राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मेहनत घेणाऱ्या विखेंवर आता युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जवाबदारी असणार आहे. काँग्रेसमध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला होता. मात्र यावेळी त्यांना युतीच्या उमेदवारासाठी काम करावे लगणार आहे. त्यामुळे श्रीरामपूर मधील मतदार यावेळी युतीच्या 'निशाणी'ला की काँग्रेसच्या 'उमेदवारा'ला मत टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना २१ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे हीच परिस्थिती विधानसभेत राहिले तर काँग्रेसची अडचण वाढू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरचे राजकरण शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याभोवती फिरत आहे. त्यामुळे यावेळी हेच श्रीरामपूरकर कुणाला पाणी पाजणार याची चर्चा पहायला मिळत आहे.

१९९५ पासून २०१४ पर्यंत श्रीरामपूर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत विखे पिता-पुत्र यांच्या भाजपमध्ये येण्याने युतीची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यात प्रत्येकवेळी काँग्रेसचा प्रचार करणारे विखे आता युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे यावेळी श्रीरामपूरमधील लढत महत्त्वाची ठरणार आहे.

लोकसभा निवडणुक २०१९

सदाशिव लोखंडे ( शिवसेना )          -  ८६ हजार ६३९

भाऊसाहेब कांबळे ( काँग्रेस )          -  ६५ हजार १८१

विधानसभा निवडणूक २०१४

भाऊसाहेब कांबळे ( काँग्रेस )        - ५७ हजार ११८

भाऊसाहेब वाकचौरे ( भाजप )    -  ४५ हजार ६३४

लहू कानडे ( शिवसेना )              -  ३७ हजार ५८०

सुनिता गायकवाड ( राष्ट्रवादी ) -  ३५ हजार ०९५