शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धक्कादायक! ७५ हजार बोगस बालके दाखवून कोट्यवधी लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 2:43 AM

राज्यभरातील बालगृहांमधील प्रकार

मुंबई : राज्य सरकारने अनाथ बालकांच्या संगोपन, शिक्षणासाठी स्थापन केलेल्या बालगृहांसाठी तरतूद केलेल्या कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचा ठपका विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे. समितीचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी या बाबतचा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर केला.२०१० ते २०१५ या काळात अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे घोटाळे झाले आणि ते करताना तब्बल ७५ हजार बालके ही बोगस होती असा निष्कर्ष काढत लोकलेखा समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची शिफारस केली आहे. २०१०-२०१५ या कालावधीत विभागाने मागितलेल्या निधीपैकी ७६ टक्के म्हणजे ८७१.६ कोटी रुपये मंजूर केले आणि ५९५.६६ कोटी रुपयांची तरतूद केली. या कालावधीत ११५३ बालगृहांमध्ये ९५ हजार बालके सदर योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले. २०१६ मध्ये या प्रकरणाची तपासणी केली असता ज्या बालकांना स्वत:चे घर आहे अशा बालकांनाही प्रवेश देण्यात आला होता. या बालकांना घरी पाठवण्यात आले. तसेच वास्तवात ९५ हजार बालकांपैकी फक्त २१ हजार बालकेच असल्याचे दिसून आले. याचा अर्थ जवळजवळ ७५ हजार पेक्षा जास्त बोगस व अपात्र बालकांची नोंद झाल्याचे आढळून आले. यावरून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अनाठायी खर्च करण्यात आला, असा ठपकाही लोकलेखा समितीने ठेवला आहे.स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी कराहे घोटाळे अजाणतेपणाने निश्चितच झाले नाहीत. त्यात अधिकारी, संस्थाचालकांचे संगनमत होते. या प्रकरणाची तीन महिन्यांत प्राथमिकचौकशी करून अहवाल समितीला द्यावा, तसेच अहवालातील निष्कर्षाच्या आधारे एसआयटीसारख्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, असे समितीने म्हटले आहे.