शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

धक्कादायक! कॅन्सर रुग्णांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमाकांवर; महिला आणि पुरुषांमध्ये कोणता कर्करोग सर्वाधिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:02 IST

Cancer Cases in india: २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे.

-चंद्रशेखर बर्वे, नवी दिल्लीMost Cancer Patients in Maharashtra: भारतातील महिला आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मागील १० वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या साडेपाच लाखांनी वाढली असून सध्या भारतात कॅन्सरचे १५ लाख ७० हजार रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरानुसार, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा आणि महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. 

हेही वाचा >>खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतात...

याशिवाय पुरुषांमध्ये मुख आणि प्रोस्टेटचे तर महिलांमध्ये गर्भाशय आणि डिंबग्रंथी (ओवरी) चा कर्करोग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे.

भारतात दहा वर्षात किती रुग्ण वाढले? 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, भारतात सध्या कॅन्सरचे १५ लाख ६९ हजार ७९३ रुग्ण आहेत. २०१५ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात पाच लाख ४७ हजार १५ रुग्ण वाढले आहेत. 

एक लाख लोकांमागे १०० जण कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. मात्र, २०४० पर्यंत देशातील कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाख १८ हजार ६९४ वर पोहोचण्याची शक्यता ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्वेटरी, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आईएआरसी) ने वर्तविली असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत दिली.

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन (४८,२४,७०३), तर दुसऱ्या स्थानी अमेरिका (२३,८०,१८९) आहे.

कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक (२,२१,०००) रुग्ण आहेत. 

कोणत्या राज्यात किती कॅन्सर रुग्ण?

महाराष्ट्र (१,२७,५१२), पश्चिम बंगाल (१,१८,९१०), बिहार (१,१५,१२३) आणि तामिळनाडू (९८,३८६) रुग्ण आहेत. महाराष्ट्रात २०२० मध्ये १,१६,१२१ रुग्ण होते. २०२४ पर्यंत हा आकडा १,२७,५१२ वर पोहोचला आहे. अर्थात, पाच वर्षात ११ हजार ३९१ रुग्ण वाढले आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाministerमंत्री