शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

धक्कादायक! कॅन्सर रुग्णांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमाकांवर; महिला आणि पुरुषांमध्ये कोणता कर्करोग सर्वाधिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:02 IST

Cancer Cases in india: २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे.

-चंद्रशेखर बर्वे, नवी दिल्लीMost Cancer Patients in Maharashtra: भारतातील महिला आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मागील १० वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या साडेपाच लाखांनी वाढली असून सध्या भारतात कॅन्सरचे १५ लाख ७० हजार रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरानुसार, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा आणि महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. 

हेही वाचा >>खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतात...

याशिवाय पुरुषांमध्ये मुख आणि प्रोस्टेटचे तर महिलांमध्ये गर्भाशय आणि डिंबग्रंथी (ओवरी) चा कर्करोग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे.

भारतात दहा वर्षात किती रुग्ण वाढले? 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, भारतात सध्या कॅन्सरचे १५ लाख ६९ हजार ७९३ रुग्ण आहेत. २०१५ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात पाच लाख ४७ हजार १५ रुग्ण वाढले आहेत. 

एक लाख लोकांमागे १०० जण कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. मात्र, २०४० पर्यंत देशातील कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाख १८ हजार ६९४ वर पोहोचण्याची शक्यता ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्वेटरी, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आईएआरसी) ने वर्तविली असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत दिली.

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन (४८,२४,७०३), तर दुसऱ्या स्थानी अमेरिका (२३,८०,१८९) आहे.

कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक (२,२१,०००) रुग्ण आहेत. 

कोणत्या राज्यात किती कॅन्सर रुग्ण?

महाराष्ट्र (१,२७,५१२), पश्चिम बंगाल (१,१८,९१०), बिहार (१,१५,१२३) आणि तामिळनाडू (९८,३८६) रुग्ण आहेत. महाराष्ट्रात २०२० मध्ये १,१६,१२१ रुग्ण होते. २०२४ पर्यंत हा आकडा १,२७,५१२ वर पोहोचला आहे. अर्थात, पाच वर्षात ११ हजार ३९१ रुग्ण वाढले आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाministerमंत्री