शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

शिवसेना आमदार भास्कर जाधव प्रतिक्रिया देत होते, तितक्यात नारायण राणेंची गाडी आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 20:03 IST

नारायण राणेंची मानसिक स्थिती ठीक नाही. सकाळी राणेंनी वक्तव्य केले होते. मी Normal माणूस नाही. माझा देखील हा दावा आहे

ठळक मुद्दे"राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणायचं ते तुम्ही ठरवा.नारायण राणे Normal नव्हे तर Abnormal आहेत. त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने चुकीचं विधानं करत आहेत. जर उपचार झाले नाहीत तर काहीतरी गुन्हे करतील म्हणून त्यांना अटक करायला हवी होती

चिपळूण – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणेंच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत होते. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी राणेंविरोधात संताप व्यक्त करत आंदोलन केले. शिवसेनेच्या विविध नेत्यांनी नारायण राणेंविरोधात भाष्य केले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही राणेंवर जोरदार प्रहार केला.

भास्कर जाधव म्हणाले की, नारायण राणेंची मानसिक स्थिती ठीक नाही. सकाळी राणेंनी वक्तव्य केले होते. मी Normal माणूस नाही. माझा देखील हा दावा आहे की नारायण राणे Normal नव्हे तर Abnormal आहेत. त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने चुकीचं विधानं करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. जर उपचार झाले नाहीत तर काहीतरी गुन्हे करतील म्हणून त्यांना अटक करायला हवी असं त्यांनी सांगितले. परंतु राणेंच्या अटकेवर ही प्रतिक्रिया देताना योगायोगानं नारायण राणेंची गाडी त्याच्या बाजूनेच पुढे गेली.

नेमकं काय म्हणाले होते भास्कर जाधव?

"राणे असं का बडबडत आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी डॉ. जलील पारकर यांना फोन केला होता. पारकर अजून आहेत. त्यांच्या फोनवरूनच शिवसेनाप्रमुखांनी राणेंना शाप दिला होता. बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. ते जे बोलायचे ते जे भविष्यवाणी करायचे ती खरी व्हायची. बाळासाहेबांचं प्रत्येक वक्तव्य खरं ठरलेलं आहे. राणे केंद्रीय मंत्री होऊ द्या की आणखी काही होऊ द्या, सिद्धपुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप आहे, त्यानुसार राणेंची अधोगती सुरू आहे", असं भास्कर जाधव म्हणाले होते.  

राणे कोकणाला लागलेला महाकलंक

"राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणायचं ते तुम्ही ठरवा. हे तिघेही म्हणजे संपूर्ण कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक आहेत. राणे आणि त्यांच्या मुलांची वक्तव्य चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून राणेंनी असं विधान करणं शोभतं का? राणेंचं शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही", असं इशारा भास्कर जाधव यांनी दिला होता.

पोलीस बळ वापरा अन् अटक करा, कसलं वॉरंट मागतायेत?

सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची क्लीप व्हायरल होत आहे. यात अनिल परब पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत असल्याचं दिसतात. त्यात कसलं अटक वॉरंट मागतायेत? पोलीस बळाचा वापर करून अटक करा असं ते सांगत असल्याचं स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. तर रत्नागिरी एसपी नारायण राणेंकडे गेले असता त्यांच्याकडे अटक वॉरंटची मागणी होत आहे. जोपर्यंत अटक वॉरंट दाखवत नाहीत तोवर अटकेला विरोध करू असा पवित्रा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी घेतला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरे