शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

"मुंबई आंदण देणार नाही, १६ डिसेंबरला अदानींच्या कार्यालयावर धडकणार शिवसेनेचा मोर्चा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:56 IST

मुंबईतील अनेक मोठे प्रकल्प अदानी यांच्याच घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असून शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

मुंबई : धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि विकासक अदानी समूह यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 'धारावीचा पुनर्विकास करताना पहिल्यांदा नीट सर्वे झाला पाहिजे. दडपशाहीने सर्वे झाल्यास शिवसेना असा सर्वे हाणून पाडेल. शिवसेना आज प्रशासनात नाही. पण शिवसेनेची ताकद ही सरकारमध्ये असण्यात वा नसण्यात नसून शिवसेनेची ताकद रस्त्यावर आहे आणि सरकारला व अदानींना जाब विचारण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे,' अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. ते 'शिवालय' या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

धारावीचा पुनर्विकास हा लोकांच्या नाही तर गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, "धारावीत आता जे लोक राहात आहेत, त्यांचं धारावीतच पुनर्वसन व्हावं, अशी आमची मागणी आहे. धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलं आहे आणि ३०० स्क्वेअर फूट जागा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुनर्विकास करत असताना धारावीकरांना ४०० ते ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा मिळायला हवी. धारावीला आज सोन्यापेक्षा जास्त भाव आला आहे, त्यामुळे आज सगळ्यांची नजर धारावीवर आहे. धारावीमध्ये धारावीकरांना घर मिळालीच पाहिजेत, पण सोबतच गिरणी कामगार,  पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही तिथं घरं देण्यात यावीत. टीडीआरबाबतही गोंधळ आहे. इतर विकासकांनाही टीडीआर घ्यायचा असेल तर ४० टक्क्यांची अट टाकत तो टीडीआर अदानींकडूनच विकत घ्यायला लागेल. मात्र यासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करायला हवी. जसा बीडीडी चाळींचा विकास म्हाडाकडून केला जातो, तसा धारावीचा विकास सरकारने करावा. टीडीआर सरकारकडून विकत घेतला गेला पाहिजे. अदानींचा विकास कसा होईल, याचा विचार या सगळ्यात गेला आहे,' असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

"हे सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम करत आहे. नियोजनशून्य कामामुळे मुंबईकरांचा जीव घुसमटत आहे. आजपर्यंत एवढं प्रदूषण कधीही पाहिलं नव्हतं. मुंबईतील इतरही तीन मोठे प्रकल्प यांच्याच घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. आम्हाला मुंबई कोणी आंदण म्हणून दिलेली नाही. त्यामुळे आम्हीही आमची मुंबई कोणाला आंदण म्हणून दिली जाऊ देणार नाही," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकार आणि अदानी उद्योगसमुहावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेdharavi-acधारावीGautam Adaniगौतम अदानीFarmerशेतकरी