शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Sanjay Raut: शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायचीय; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 20:17 IST

पुढची अनेक वर्ष महाराष्ट्रावर भगवाच झेंडा फडकत राहील. ही गर्दी नव्हे शक्ती आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, आमचा नाद करू नका असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

औरंगाबाद - मराठवाड्यात शिवसेनेची ही जाहीर सभा होतेय. ही गर्दी नव्हे तर शक्ती आहे. याच मैदानावर काही दिवसांपूर्वी सभा घेऊन शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा केली गेली. परंतु मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद अजून जन्माला यायची आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर जे आहेत ते शिवसेनेचे वाघ आहेत आणि या वाघाचा बाप उद्धव ठाकरे आहेत. खूप महिन्याने अतिविराट सभा मराठवाड्यात होतेय. ३७ वर्षापूर्वी मराठवाड्यात पहिली शाखा स्थापना झाली. त्याचा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते साजरा होतेय हे भाग्याचा क्षण आहे. गर्दी म्हणजे समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटेचा तडाखा भाजपाला बसला तर पाणी मागायला उठणार नाहीत. अनेक महिन्यांनी मुंबईच्या बाहेर उद्धव ठाकरेंची सभा विराट सभा होतेय. ही सभा दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. 

CM Uddhav Thackeray Aurangabad Speech: काश्मीरातील हिंदू उद्धव ठाकरेंकडे अपेक्षेनं पाहतायत; शिवसेना, महाराष्ट्र आधार देईल - संजय राऊत

याच मैदानात काही जणांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायची आहे. हा मराठवाडा ज्याने औरंगजेबाला या मातीला गाडलं. निजामाला पळवून लावलं. ही शिवसेना निजामाच्या बापाच्या छातीवर पाय रोवून महाराष्ट्रात सत्तेत आली आहे. पुढची अनेक वर्ष महाराष्ट्रावर भगवाच झेंडा फडकत राहील. ही गर्दी नव्हे शक्ती आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, आमचा नाद करू नका. सातत्याने शिवसेनेवर हल्ले केले जात आहे. संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला गेला. आक्रोश पाहायचा असेल भाजपाच्या नामर्द लोकांनी काश्मीरला पंडितांवर होणारे अत्याचार पाहावेत. रोज हिंदूंवर भ्याडहल्ले होत आहेत. हे सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेऊन बसले आहे. हिंदुत्व आम्हाला शिकवता? दिवसा-ढवळ्या त्यांना मारलं जातंय. संपूर्ण काश्मीर खोरे आणि पंडित उद्धव ठाकरेंकडे मोठ्या आशेने पाहत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, काश्मीर पंडितांना आधार द्यायचं काम हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा केले. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पुढे आहेत. प्राण जाईल पण वचन जाणार नाही. उठसूठ शिवसेनेवर हल्ले केले जात आहेत. त्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेना समर्थ आहे. महागाई वाढली. पेट्रोल डिझेलचे दर वाढले त्यावर प्रश्न विचारले तर ज्ञानवापी, ताज महाल असे प्रश्न पुढे आणत आहेत. कैलास मानसरोवर चीनच्या ताब्यात आहे. तेथील शिवलिंग भारतात आणा. परंतु एवढी हिंमत त्यांच्यात नाही. ठाकरे सरकारने देशाला दिशा दिली. फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश उद्धव ठाकरेंकडे अपेक्षेने पाहतोय असं संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे