शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विरोधी पक्षाचा नव्हे तर महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:32 IST

सरकार निर्लज्ज आहे. सत्ताधाऱ्यांना महापुरुषांबद्दल संवेदना नसेल तर हे सरकार लाचार आहे अशी बोचरी टीका राऊतांनी केली.

मुंबई - महापुरुषांच्या अवमानाविरोधात मुंबईत महाविकास आघाडीकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र हा मोर्चा राज्यातील विरोधी पक्षाचा नसून महाराष्ट्रप्रेमींचा आहे. ज्याप्रकारे राज्यातील महापुरुषांचा अपमान सुरू आहे. सीमाप्रश्नावर अजूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक आहेत. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर पळवले जातायेत. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय आहे आणि सरकार त्यावर गप्प बसलंय. त्यामुळे समस्त महाराष्ट्रप्रेमींना आवाहन आहे तुम्ही मोर्चाला या असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्याकडे मोर्चासाठी रीतसर परवानगी मागितली. महाराष्ट्रात आंदोलन करताना लोकशाही मार्गाने बंदी आली असेल तर सरकारने तस जाहीर करावं. आणीबाणी कुणी पुढच्या दाराने आणली आहे का? हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा आहे/ याप्रकारे देवतांचा अपमान सुरू आहे. डॉ. बाबासाहेबांचा अपमान सुरू आहे. सावित्रीबाईंचा अपमान सुरू आहे. शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. त्यासाठी हा मोर्चा आहे. महाराष्ट्र प्रेमींच्या मोर्चाला सरकार परवानगी नाकारत असेल तर मग या राज्यावर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलेलं आहे अशी टीका त्यांनी केली. 

तसेच सरकारमधील लोकांनी मोर्चात सामील झालं पाहिजे, हा महाराष्ट्रासाठी मोर्चा आहे. मोर्चाला परवानगी नाकारण्याची कोणी हिंमत करेल असं मला वाटतं नाही. त्याचे फार वेगळे परिणाम महाराष्ट्रात उमटतील. महाराष्ट्रद्रोही असे उद्योग करू शकतात. मोर्चा जाहीर झालाय आणि तो होईल. संयुक्त महाराष्ट्रात ज्याप्रकारे महाराष्ट्रप्रेमींचे मोर्चे निघाले तशाप्रकारे हा मोर्चा आहे. अलोकशाही पद्धतीने घटनाबाह्य सरकार राज्यात बसलंय. आम्ही कुठलेही घटनाबाह्य काम करत नाही. लोकशाही मार्गानेच आम्ही पुढे जात आहोत त्यावरच हे सरकार खाली खेचू असा इशाराही संजय राऊतांनी दिला. 

सरकारवर बोचरी टीकासरकार निर्लज्ज आहे. सत्ताधाऱ्यांना महापुरुषांबद्दल संवेदना नसेल तर हे सरकार लाचार आहे. म्हणून तर हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा आहे अशा शब्दात राऊतांनी बोचरी टीका केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा