शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

नारायण राणे म्हणजे किळसवाणी व्यक्ती: भास्कर जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 12:25 IST

कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.

मुंबई: शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीलासोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सतत टीका करणारे भाजपचे नेते नारायण राणेंचा शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तर नारायण राणे हे महाराष्ट्राला किळसवाणी व्यक्ती वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना जाधव म्हणाले की, नारायण राणेंच्या वक्तव्याला सद्या कुणीही कवडीची किंमत देत नाही. तर राणे यांचं राजकीय क्षेत्रातील महत्व संपले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचे योगदान नसल्याने त्यांना कुणीही मानत नाही. कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.

तसेच, मी खूप अभ्यासू,विचारवंत व मोठा वक्ता असल्याचे त्यांना वाटत असले तरीही चार वाक्य तरी राणेंना दिल्लीत बोलता येते का ? असा प्रश्न सुद्धा जाधवांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे दिल्ली आणि राज्याच्या राजकारणात राणेंना कोणतेही महत्व उरलेले नाही. आपली कुणीतरी दखल घ्यावी म्हणून त्यांची सतत बडबड सुरु असते. स्वता:च्या मुलाला निवडून आणण्याची पात्रता त्यांची राहिली नाही, त्यामुळे राणेंनी इतरांवर टीका करू नयेत, असा खोचक टोला सुद्धा आमदार जाधव यांनी राणेंना लगावला.

तर स्वता:चं अस्तीत्व टिकवून ठेवण्याचा राणेंचा केविलवाणी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे हे किळसवाणी व्यक्ती म्हणून महाराष्ट्राला वाटायला लागले आहेत. त्याचप्रमाणे नारायण राणेंचा पायगुण असा आहे की, ज्या पक्षात ते जातात त्याच्या पराभवचं होत असतो. त्यामुळे भाजपला सुद्धा आपला मुख्यमंत्री करता आले नाही. शिवसेना सोडताना जे आमदार राणेंनी सोबत नेले होते, त्यातील एकाला सुद्धा त्यांना निवडून आणता आले नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी जाधव यांनी केला.