शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नारायण राणे म्हणजे किळसवाणी व्यक्ती: भास्कर जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 12:25 IST

कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.

मुंबई: शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीलासोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सतत टीका करणारे भाजपचे नेते नारायण राणेंचा शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तर नारायण राणे हे महाराष्ट्राला किळसवाणी व्यक्ती वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना जाधव म्हणाले की, नारायण राणेंच्या वक्तव्याला सद्या कुणीही कवडीची किंमत देत नाही. तर राणे यांचं राजकीय क्षेत्रातील महत्व संपले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचे योगदान नसल्याने त्यांना कुणीही मानत नाही. कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.

तसेच, मी खूप अभ्यासू,विचारवंत व मोठा वक्ता असल्याचे त्यांना वाटत असले तरीही चार वाक्य तरी राणेंना दिल्लीत बोलता येते का ? असा प्रश्न सुद्धा जाधवांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे दिल्ली आणि राज्याच्या राजकारणात राणेंना कोणतेही महत्व उरलेले नाही. आपली कुणीतरी दखल घ्यावी म्हणून त्यांची सतत बडबड सुरु असते. स्वता:च्या मुलाला निवडून आणण्याची पात्रता त्यांची राहिली नाही, त्यामुळे राणेंनी इतरांवर टीका करू नयेत, असा खोचक टोला सुद्धा आमदार जाधव यांनी राणेंना लगावला.

तर स्वता:चं अस्तीत्व टिकवून ठेवण्याचा राणेंचा केविलवाणी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे हे किळसवाणी व्यक्ती म्हणून महाराष्ट्राला वाटायला लागले आहेत. त्याचप्रमाणे नारायण राणेंचा पायगुण असा आहे की, ज्या पक्षात ते जातात त्याच्या पराभवचं होत असतो. त्यामुळे भाजपला सुद्धा आपला मुख्यमंत्री करता आले नाही. शिवसेना सोडताना जे आमदार राणेंनी सोबत नेले होते, त्यातील एकाला सुद्धा त्यांना निवडून आणता आले नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी जाधव यांनी केला.