शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

..तर त्याचा परिणाम देशाच्या लोकशाहीवर जास्त होईल; भास्कर जाधवांचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 16:19 IST

वर्षानुवर्षे जो आकस होता तो शाह यांच्या रुपाने बाहेर पडला. महाराष्ट्राला अमित शाह यांनी आव्हान दिलंय असं भास्कर जाधवांनी म्हटलं.

मुंबई - उद्धव ठाकरेंचे सरकार ज्या विश्वासघातानं पाडले गेले त्यानंतर ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली. हे प्रकरण शिवसेनेशी संबधित असलं तरी त्याचा परिणाम देशातील लोकशाहीवर होईल. देशातल्या राज्यघटनेवर, पक्षांतर्गत कायद्यावर होईल. न्यायाने, नीतीमत्तेने आणि कायद्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला पाहिजे. परंतु दुर्देवाने काही उलटा निर्णय लागला तर त्याचा परिणाम शिवसेनेवर कमी आणि देशातील लोकशाहीवर जास्त होईल अशी भीती शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. 

भास्कर जाधव म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे विविध परिणाम पाहायला मिळतील. परंतु वेळ लागेल मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निकाल लागेल. निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा ही शिंदे गटाची मागणी कशाच्या जीवावर आहे? मूळ शिवसेनेतील ४० आमदार विश्वासघातानं बंडखोरी केली म्हणून ते पक्षावर दावा करतात. या महाराष्ट्रात एकच आमदार असलेला पक्ष आहे. तो आमदार बाहेर पडला आणि म्हणाला हा पक्ष माझा आहे असं होत नसतं. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत जो गट वेगळा झाला आहे त्याला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल किंवा आमदारकी रद्द होईल हीच कायद्यातील तरतूद आहे. त्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्याचा प्रकार आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच आगामी निवडणुका नोव्हेंबरमध्ये झाल्या तर शिवसेनेच्या दृष्टीनं धनुष्यबाण चिन्ह महत्त्वाचं आहे. शिवसेनेने जेव्हापासून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हे आमचं चिन्ह आहे. चिन्हाचा जो काही निर्णय व्हायचा तेव्हा होईल. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राला येऊन संपूर्ण महाराष्ट्रालाच आव्हान दिले आहे. १०६ हुतात्मे महाराष्ट्राने देऊन मुंबई मिळवली. ते जिंकण्याचं स्वप्न गेली अनेक वर्ष पाहत असल्याचं शाह यांनी सांगितले. वर्षानुवर्षे जो आकस होता तो शाह यांच्या रुपाने बाहेर पडला. महाराष्ट्राला अमित शाह यांनी आव्हान दिलंय. त्यामुळे चिन्ह जेवढं महत्वाचं तेवढी मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहणं महत्त्वाचं आहे असं भास्कर जाधवांनी सांगितले. 

दसरा मेळावा बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेच घेतीलगेल्या ५०-६० वर्षाचा इतिहास घडवणारे, सांगणारे लोक आजही महाराष्ट्रात आहेत. शिवाजी पार्क, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाते सभा घेण्यापुरते नाही. दसरा मेळावा ऐतिहासिक आहे. हे नातं तोडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. दसरा मेळाव्याची सुरुवात शिवाजी पार्कातून झाली. त्यामुळे तिथेच आमचा मेळावा होईल. शिवसेनेला दुसरी जागा सुचवणाऱ्यांनी स्वत: त्या जागेवर मेळावा घ्यावा आणि शिवसेनेची ही परंपरा मोडू नये अशी शिवसेना नेते भास्कर जाधवांनी विनंती केली.जे निष्ठेने, आपुलकीने राहतील ते आमचेकुणाला थांबवायचं असतं तर मी तेव्हाच थांबवू शकत होतो. परंतु जे प्रेमाने, निष्ठेने, आपलेपणाने शिवसेनाप्रमुखांसोबत थांबणारे जे कुणी असतील त्यांनी राहावे. ज्यांना जायचं असेल त्यांच्याशी दार उघडं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या संपर्कात कोण याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही जाधवांनी म्हटलं.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे