शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

Deepak Kesarkar Press Conference: "आम्ही राजीनामा मागितलेलाच नाही, फक्त 'युती'ची विनंती केलीय"; शिंदेगटाने सांगितलं बंड नेमकं कशासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:52 IST

एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकरांनी मांडली बाजू

Deepak Kesarkar Press Conference: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष काही केल्या संपताना दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या सुमारे १५ ते २० आमदारांनी सुरूवातीला सुरत येथे ठाण मांडले आणि शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच भाजपासोबत पुन्हा नैसर्गिक युती करून नवीन सरकार स्थापन करण्याचीही मागणी केली. हा विचार पटल्याने हळूहळू शिंदे गटातील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली आणि आता सुमारे ३८ आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यापैकी, दीपक केसरकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितलेलाच नाही, याचीही त्यांनी साऱ्यांना आठवण करून दिली.

"आमची मनं साफ आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. आम्ही विनंती केली होती की शिवसेना-भाजपाने एकत्र यावं. ते म्हणतात, मी राजीनामा देतो. राजीनामा कुणी मागितलेला नाही. त्यांना भावनिक वळण द्यायचं आहे. ते नेते आहेत. बाळासाहेबांनंतर त्यांनी पक्ष चालवला आहे. त्यांच्याकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात, एवढीच अपेक्षा आहे", असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, "उद्धव ठाकरे यांना आम्ही सुरूवातील भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला होता. मी स्वत: उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. पाच सीनिअर मंत्रीही भेटले होते. त्यामुळे मला वाटतं की अजूनही त्यांनी आमच्या मागणीवर विचार करावा", असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेतील इतर मुद्दे-

>> उद्धव ठाकरे प्रत्येकाला समजून घेतात, पण निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात, त्यात नाराजी वाढते. >> संघटना कोणीच तोडत नाही. आम्ही त्याच संघटनेचे सदस्य होतो, आहोत आणि राहू.>> मी आमच्याच नेतेमंडळींवर काही आरोप करणार नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.>> आमच्यापैकी कुणीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही.>> आदित्य ठाकरे आमच्यासोबत जेव्हा बसमध्ये होते. त्यांनाही आम्ही सगळं समजावून सांगितलं होते. >> शिवसेना आणि भाजपा एकत्रच राहिलं पाहिजे हे मी पहिल्यापासून सांगतोय.>> पंतप्रधानांना विशेष प्रेम शिवसेनेबदद्ल आणि बाळासाहेबांबद्दल आहे.>> कोणाच्याच नावाने मतं मागितलेली नाही. आम्ही अन्य पक्षातूनही निवडून आलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून येत असते तर सगळे निवडून आले असते.>> उमेदवारा देखील कामं करतात त्यामुळे त्यांचेही मूल्य जनतेत असते.>> केवळ पक्षाचं ठराविक मतदान नसतं.>> आजच्या विधानसभेतील किमान ७० ते ८० किंवा १०० उमेदवार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात कारण ते लोक मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम करतात.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा