शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना 'कन्फ्यूज'; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत वैचारिक गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 18:52 IST

भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे.

मुंबई - भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दल अत्यंत ठाम आणि जाज्ज्वल्य भूमिका होती. पण, उद्धव ठाकरे त्याबाबत संभ्रमात असल्याचं त्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमधून जाणवतं. त्याचप्रमाणे, काही धोरणं त्यांना पटत आहेत, पण केवळ मोदी सरकार ती राबवतंय म्हणून ते त्याला विरोध करताहेत, असंही प्रकर्षाने दिसतं. 

'कृष्णाने गीता सांगितली, पण ती अमलात आणली आपल्या शिवाजी महाराजांनी', या वाक्याने उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला सुरुवात झाली होती. त्यातून शिवाजी महाराजांबद्दलचा आदर जाणवत होताच, पण गीतामाहात्म्यही अधोरेखित होत होतं. भगवद्गीतेचंच सार सांगणारा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्याच दिवशी हा पहिला भाग प्रसिद्ध झाला होता. टिळकांबद्दल ठाकरे कुटुंबाला किती अभिमान आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु, भगवद्गीता वाटपाच्या प्रश्नावर उद्धव यांनी अगदीच गुळमुळीत भूमिका घेतली. 

'हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून गीतेविषयी आदर राखायलाच हवा, पण देशात किंवा महाराष्ट्रात ज्या ‘कॉन्व्हेन्ट’ स्कूल्स आहेत तेथे गीता वाटणार आहात काय? भगवद्गीता वाचण्यापेक्षा तुम्ही शिक्षण व्यवस्था का सुधारत नाही? आधीच ज्या मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे आहे त्या ओझ्यामध्ये गीतेचे ओझे का टाकता?', असे प्रश्न उद्धव यांनी मुलाखतीत विचारले आहेत. जी भगवद्गीता शिवाजी महाराजांनी आचरणात आणली, त्या गीतेचा खरं तर हिंदुत्ववादी शिवसेनेनं आग्रह धरला पाहिजे. बाळासाहेबांनी कदाचित गीतावाटपाचं समर्थन केलं असलं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. 

हिंदू सण आणि खास करून दही हंडी उत्सवासाठी शिवसेना अत्यंत आग्रही असते. शिवसेनेचे अनेक नेते आपापल्या भागात उंचच उंच हंड्याही उभारतात. पण, त्याच सेनेला श्रीकृष्णाची भगवद्गीता जड का वाटते?, असा प्रश्न काही सूज्ञ मंडळींनी केला आहे.

मी अयोध्येत जाऊन रामल्लाचे दर्शन घेणार आहे, वाराणसीत जाऊन गंगा आरतीत सहभागी व्हायचे आहे, असं सांगत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडलाय. पण, कृष्णाच्या भगवद्गीतेला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय.

'वन नेशन वन इलेक्शन' ही कल्पना चांगली आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत मांडलंय. म्हणजे, ती प्रत्यक्षात येणं देशासाठी फायद्याचं असल्याचं त्यांना वाटतंय. पण त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केल्यानं उद्धव यांनी त्यातही खोड काढल्याचं दिसतं. सर्वांना एकदा मूर्ख बनवण्याची संधी म्हणून ते 'वन नेशन'वाले इलेक्शन बघताहेत का?, असा सवाल त्यांनी केलाय. त्यामुळे दोन वाक्यांमध्ये विरोधाभास दिसतोय.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत