शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'संभाजीनगर' नामांतराच्या गुप्त हालचाली?; भाजपावर टीका करत चंद्रकांत खैरेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:05 IST

संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण?

औरंगाबाद – १९८८ पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मी सगळीकडे संभाजीनगर बोलतो. २ वर्ष कायदेशीर तयारी केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष काम करतोय. उद्धव ठाकरे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही हा त्यांचा दोष आहे असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेदेवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये आले तेव्हा त्यांना भगवी शाल द्यायचो. संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण?, आम्ही १९८८ पासून संभाजीनगर म्हणतो. टाळ्या वाजवण्यासाठी उगाच टीका करू नये. मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे. बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे कायदेशीर रित्या संभाजीनगर करण्यासाठी तयारी करत आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच औवेसी ही भाजपाची बी टीम आहे. वंचित आघाडीला भाजपाने पाठिंबा दिला होता. तुम्ही आमच्यावर टीका करू नका. देवेंद्र फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री असताना संभाजीनगर करावं असा ठराव पास केला होता. त्यांनी भाषणात खोटं बोलू नये. ५ वर्ष का हालचाल केली नाही. भाजपावालेच खोटे बोलतात. मला बहिरे करायला तुम्ही डॉक्टर आहात का? असा सवाल चंद्रकांत खैरेंनी केला आहे.

दरम्यान, विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र पाठवलं. मी स्वत: भेटलो तेव्हा कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेऊ बोलले. मग अद्याप का झाले नाही? भाजपा वारंवार खोटे बोलत आहे. मी उघड करत नाही परंतु संभाजीनगरबाबत कायदेशीर काम सुरू आहे. विभागीय प्रस्ताव तयार झाले आहेत. आम्ही गप्प बसलो नाही असंही चंद्रकांत खैरेंनी दावा केला आहे.

वो खैरे व्हा आता भैरे

औरंगाबदचा कायम झाला खसरा, भाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असे फडणवीसांनी म्हटले. तसेच, तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित होते. आम्ही तुमच्याच लाईनवर बोलतो, हे सांगण्यासाठी काँग्रेसची भाषा त्यांनी वापरली. संघावर जशी काँग्रेस टीका करते, तीच भाषा त्यांनी वापरली. आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण, मुख्यमंत्री म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होते, असे म्हणत फडणवीसांनी औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, आता भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असेही फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrakant Khaireचंद्रकांत खैरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे