शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

'संभाजीनगर' नामांतराच्या गुप्त हालचाली?; भाजपावर टीका करत चंद्रकांत खैरेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:05 IST

संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण?

औरंगाबाद – १९८८ पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मी सगळीकडे संभाजीनगर बोलतो. २ वर्ष कायदेशीर तयारी केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष काम करतोय. उद्धव ठाकरे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही हा त्यांचा दोष आहे असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेदेवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये आले तेव्हा त्यांना भगवी शाल द्यायचो. संभाजीनगरबाबत विचारणा केली तर होऊन जाईल इतकं गोड बोलून सांगायचे. पण एकदाही त्यांनी ते केले नाही. मग बहिरे कोण?, आम्ही १९८८ पासून संभाजीनगर म्हणतो. टाळ्या वाजवण्यासाठी उगाच टीका करू नये. मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे. बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे कायदेशीर रित्या संभाजीनगर करण्यासाठी तयारी करत आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच औवेसी ही भाजपाची बी टीम आहे. वंचित आघाडीला भाजपाने पाठिंबा दिला होता. तुम्ही आमच्यावर टीका करू नका. देवेंद्र फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री असताना संभाजीनगर करावं असा ठराव पास केला होता. त्यांनी भाषणात खोटं बोलू नये. ५ वर्ष का हालचाल केली नाही. भाजपावालेच खोटे बोलतात. मला बहिरे करायला तुम्ही डॉक्टर आहात का? असा सवाल चंद्रकांत खैरेंनी केला आहे.

दरम्यान, विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र पाठवलं. मी स्वत: भेटलो तेव्हा कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेऊ बोलले. मग अद्याप का झाले नाही? भाजपा वारंवार खोटे बोलत आहे. मी उघड करत नाही परंतु संभाजीनगरबाबत कायदेशीर काम सुरू आहे. विभागीय प्रस्ताव तयार झाले आहेत. आम्ही गप्प बसलो नाही असंही चंद्रकांत खैरेंनी दावा केला आहे.

वो खैरे व्हा आता भैरे

औरंगाबदचा कायम झाला खसरा, भाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असे फडणवीसांनी म्हटले. तसेच, तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित होते. आम्ही तुमच्याच लाईनवर बोलतो, हे सांगण्यासाठी काँग्रेसची भाषा त्यांनी वापरली. संघावर जशी काँग्रेस टीका करते, तीच भाषा त्यांनी वापरली. आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण, मुख्यमंत्री म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होते, असे म्हणत फडणवीसांनी औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, आता भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असेही फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrakant Khaireचंद्रकांत खैरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे