शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Raosaheb Danave : "खोतकर आणि माझे मतभेद मिटले, आता आम्ही एकत्र काम करणार"; रावसाहेब दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:13 IST

BJP Raosaheb Danave And Shivsena Arjun Khotkar : जालना जिल्ह्यात खोतकर आणि दानवे हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र यावेळी एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीदरम्यान दोघेही उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई- माजी मंत्री अर्जुन खोतकर (Shivsena Arjun Khotkar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (BJP Raosaheb Danave) देखील उपस्थित होते. जालना जिल्ह्यात खोतकर आणि दानवे हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र यावेळी एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीदरम्यान दोघेही उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "खोतकर आणि माझे मतभेद मिटले, आता आम्ही एकत्र काम करणार" असं म्हटलं आहे. 

रावसाहेब दानवे यांनी "कोणी कुणाचा कायमचा शत्रू नाही, जालन्याच्या राजकारणाची चावी भाजपाच्याच हाती राहणार" असं देखील सांगितलं आहे. तसेच "खोतकर आणि आमच्यातले वाद आता मिटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आम्ही दोघांनी एकमेकांना साखर भरवली. आता शिवसेना आणि भाजपा एकत्र असल्यामुळे आम्ही एकत्र काम करू" असं म्हटलं आहे. यासोबतच "राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नाही, शत्रू नाही. क्षणिक काही गोष्टी घडतात आणि त्यातून मतभदे वाढत असतात" असं देखील दानवे यांनी सांगितलं. 

"जालन्याच्या राजकारणाची चावी भाजपाच्याच हाती राहणार आहे. जालना मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा कायम भाजपाकडेच राहणार. आमच्यासाठी पक्षवरिष्ठांचा निर्णय महत्वाचा. त्यामुळे माझ्या जागी पक्षाने दुसरा जरी उमेदवार दिला तरी हरकत नाही. पण ही जागा भाजपाकडेच राहणार" असंही रावसाहेब दानवे म्हणाले. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

शिवसेनेचे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील?; संजय राऊतांचं मोठं विधान

"जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी स्पष्टच म्हटलं आहे. तसेच "दोन दिवसांपूर्वीच माझं अर्जुन खोतकर यांच्याशी बोलणं झालं. यावेळी त्यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले होते. दानवेंबाबत त्यांनी आणखी काही शब्द वापरले होते. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं सांगितलं आहे. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण