शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

इम्तियाज जलील यांच्या गुन्हा नोंदवण्याची शिवभक्तांची मागणी; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:36 IST

अहमदनगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशनबाहेर सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

शिर्डी - अहमदनगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशनसमोर शिवभक्तांनी आणि सकल हिंदू समाजाने आंदोलन केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तिरंगी रॅली निघाली होती. या रॅलीवेळी अनेक भागात छत्रपती संभाजीनगर फलकांना काळे फासण्याचा प्रकार घडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

याबाबत राहता पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवभक्तांनी म्हटलं की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळं फासण्याची हिंमत शिवरायांच्या भूमीत केली. त्याविरोधात तात्काळ इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी सकल हिंदू समाज आणि शिवभक्तांच्या वतीने राहता पोलीस स्टेशनबाहेर जमलो आहोत. पोलिसांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असं त्यांनी सांगितले. तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गोळवाडी फाटा, जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा, महिको कंपनी, शेलगाव ब्रिज, मात्रेवाडी यासह इतरत्र फलकांना काळे फासून विद्रूप केल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. 

तर आज राज्यभरात शिवशंभू भक्त छत्रपती संभाजीराजेंचे मावळे ठिय्या आंदोलन करतायेत. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर ते ठाण्यापर्यंत तिरंगा यात्रा काढली. एका हातात तिरंगा धरायचा आणि दुसऱ्या हाताने आमचे दैवत छत्रपती संभाजीराजेंचा द्वेष करायचा. हे औरंग्याची पिल्लावळ करू शकतात. छत्रपती संभाजीराजेंनी इस्लाम स्वीकारला नाही त्याचा राग त्यांच्या मनात आहे. तिरंगा यात्रेतून हा द्वेष दिसून आला. जलील यांना अटक करावी अशी मागणी शिवभक्तांची आहे. त्या मागणीला माझाही पाठिंबा आहे असं विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांनीही महाराष्ट्र सरकारकडे ४ प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात रामगिरी महाराज यांना अटक केली जावी, नितेश राणेंविरोधात कारवाई व्हावी, कुणीही कुठल्याही धर्माविरोधात बोलले तर त्याच्यावर कारवाई व्हावी तसेच मौलाना सलमान अजहरी यांना सोडण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे जलील यांनी केली आहे.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलNitesh Raneनीतेश राणे Hinduहिंदू