शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम”: शिवेंद्रसिंहराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 18:20 IST

BJP Shivendrasinh Raje Bhosale News: पंतप्रधान मोदींनी छत्रपतींच्या इतिहासाची कायम दखल घेतली. उलट काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला उपेक्षा करायची, दुसरीकडे बदनामी करायची हे कायम काँग्रेसच्या माध्यमातून झाले, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

BJP Shivendrasinh Raje Bhosale News: आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो. माझे वडीलही काँग्रेसमध्ये होते. महाराज मंत्री होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची कायम दखल घेतली. त्यांचा इतिहास, त्यातील घटनांची राष्ट्राशी जोडणी केली. आजवर महाराजांच्या दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या जतनासाठी त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहेत, असे कौतुकोद्गार काढताना छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले काँग्रेसवर सडकून टीका केली.

एका सभेत बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, काँग्रेस पक्ष राजकीय स्वार्थासाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करतो आणि दुसरीकडे आपल्या विरोधकांना जातीयवादी म्हणतो. त्यांचा हा खोटारडेपणा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. अशा प्रकारे जातींमध्ये भांडणे लावत हा आणि त्याचे समविचारी पक्ष त्यांची राजकीय पोळी भाजून घेतात, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम

महाराष्ट्राचीच नाही, तर संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीच सर्वाधिक बदनामी केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. त्यांचा इतिहास, पाऊलखुणा, गडकिल्ले या साऱ्यांकडे या पक्षाने मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला महाराजांची उपेक्षा करायची आणि दुसरीकडे त्यांची बदनामी करत रहायचे, असे काम काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असते आणि हे एक मोठे षड्यंत्र आहे. आमचा इतिहास, अस्मिता बदलण्याचा, पुसण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने याबाबत वेळीच सावध होत या अशा विचारांना थारा देऊ नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान, महाराजांच्या दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या जतनासाठी पावले टाकण्याची कृती काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधीही झालेली नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ बदनामी आणि जातीजातींमध्ये भांडणे लावण्यासाठी केला, या शब्दांत शिवेंद्रसिंहराजे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

 

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजcongressकाँग्रेसBJPभाजपा