शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय 'आणखीही काही' देण्यात आले; ममतांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:54 IST

महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे वक्तव्य केले आहे. शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशां शिवाय आणखीही काही देण्यात आले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. बंडखोर आमदारांचा उल्लेख करत ममता म्हणाल्या, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कुठून आला? बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरवला गेला नाही, तर इतर अनेक गोष्टी पुरवल्या गेल्या. या सर्व गोष्टी कुठून आल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये बोलत होत्या.

'आणखी काही' म्हणजे? सांगू शकाल, अशा आशयाचा प्रश्न केला असता ममता म्हणाल्या, नाही. अनेक वेळा गप्प बसणेच 'गोल्डन' आणि बोलणे 'सिल्व्हर अथवा चांदी' होते. यामुळे मी गप्प राहणेच योग्य आहे.

एवढेच नाही, तर मला माहीत आहे, की भाजप काय करू शकते आणि काय करू शकत नाही. मला काय म्हणायचे आहे, हे सर्वांनाच समजले आहे. मी म्हणते, की m, m, m, m, m, n, n, n....w, w, w, w, w आता लोकांनी स्वतःच अंदाज लावू शकतात. याशिवाय, पुढच्या निवडणुकीत जनता भाजपसाठी बुलडोझर सिद्ध होईल, असेही ममता यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे