शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय 'आणखीही काही' देण्यात आले; ममतांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:54 IST

महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे वक्तव्य केले आहे. शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशां शिवाय आणखीही काही देण्यात आले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. बंडखोर आमदारांचा उल्लेख करत ममता म्हणाल्या, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कुठून आला? बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरवला गेला नाही, तर इतर अनेक गोष्टी पुरवल्या गेल्या. या सर्व गोष्टी कुठून आल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये बोलत होत्या.

'आणखी काही' म्हणजे? सांगू शकाल, अशा आशयाचा प्रश्न केला असता ममता म्हणाल्या, नाही. अनेक वेळा गप्प बसणेच 'गोल्डन' आणि बोलणे 'सिल्व्हर अथवा चांदी' होते. यामुळे मी गप्प राहणेच योग्य आहे.

एवढेच नाही, तर मला माहीत आहे, की भाजप काय करू शकते आणि काय करू शकत नाही. मला काय म्हणायचे आहे, हे सर्वांनाच समजले आहे. मी म्हणते, की m, m, m, m, m, n, n, n....w, w, w, w, w आता लोकांनी स्वतःच अंदाज लावू शकतात. याशिवाय, पुढच्या निवडणुकीत जनता भाजपसाठी बुलडोझर सिद्ध होईल, असेही ममता यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे