शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 22:52 IST

शिवसेनेची नाणारबाबत दुटप्पी भूमिका आहे. पण जनता यात फसणार नाही. काँग्रेस नेहमीच स्थानिकांच्या बाजूने राहिली आहे आणि यापुढेही राहील. जनतेला प्रकल्प नको असेल तर काँग्रेसलाही नको, असे मत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी : शिवसेनेची नाणारबाबत दुटप्पी भूमिका आहे. पण जनता यात फसणार नाही. काँग्रेस नेहमीच स्थानिकांच्या बाजूने राहिली आहे आणि यापुढेही राहील. जनतेला प्रकल्प नको असेल तर काँग्रेसलाही नको, असे मत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

काँग्रेसच्या कोकण जनसंपर्क यात्रेचा शेवटचा टप्पा सावंतवाडीतून सुरू झाला असून, त्या निमित्ताने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील  हे सोमवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, काँग्रेस कोकण प्रभारी बी. संदीप, भाई जगताप, माजी आमदार सुभाष चव्हाण, राजन भोसले, विजय सावंत, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते विखे-पाटील म्हणाले, नाणार प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध आहे. हे आम्ही वेळोवेळी सांगितले आहे. सभागृहातही आमची हिच भूमिका राहिली आहे. पण शिवसेनेने यावर राजकारण केले. त्यांची बाहेर एक भूमिका असते आणि आत दुसरी भूमिका असते. शिवसेना नेहमी दुहेरी भूमिकेत असते, असा आरोप यावेळी विखे- पाटील यांनी केला. नाणार प्रकल्पग्रस्तांना घेऊन आम्ही दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही विरोधांची अधिकृत आहे, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. मात्र सरकार नवनवीन प्रकल्पांची घोषणा करत आहे. जनता या सरकारच्या घोषणाबाजीला फसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आमदार नितेश राणे हे जर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन काँग्रेसवरच टीका करत असतील आणि ते स्वाभिमानच्या व्यासपीठावर उपस्थित राहत असतील, तर आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निर्दशनास आणू देऊ, असेही विखे-पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील