शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना २०१९ मध्ये स्वबळावर लढणार , उद्धव ठाकरेंची घोषणा; यापुढे भाजपाशी युती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 04:12 IST

राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा सातत्याने इशारा देणा-या शिवसेनेने तूर्त सत्तेत राहण्यास पसंती दिली आहे. मात्र, २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा सातत्याने इशारा देणा-या शिवसेनेने तूर्त सत्तेत राहण्यास पसंती दिली आहे. मात्र, २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्याबैठकीत करण्यात आला. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली, तर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना नेतेपदी बढती देण्यात आली.एनएससीआयच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत स्वबळावर लढण्याचा ठराव शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी मांडला. खा.अनिल देसाई यांनी त्यास अनुमोदन दिले. आम्ही स्वबळावर लढून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी २५ तर विधानसभेच्या २८८ पैकी १५० जागा जिंकू आणि राज्यात स्वबळावर सत्ता मिळवू, असा निर्धार या ठरावाद्वारे करण्यात आला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपाशी युती केली होती. आम्ही इतकी वर्षे संयम बाळगून त्यांच्यासोबत राहिलो, पण आज हाच पक्ष शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करीत असून, त्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असल्याची टीका ठरावात करण्यात आली. पक्षप्रमुख पदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात उद्धव यांनी भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केली. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना भाऊ मानणाºया पीडीपीसोबत काश्मिरात सत्ता भोगणाºया भाजपाचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. स्वबळावर लढणे हा गुन्हा नाही. शिवसेनाप्रमुख हयात असताना प्रमोद महाजन यांनी शतप्रतिशत भाजपाची घोषणा केली होती. आता समोर मोदी असोत वा आणखी कोणी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणारच, अशी गर्जना उद्धव यांनी केली.प्रत्येक राज्यात लढणार-शिवसेना यापुढे प्रत्येक राज्यात निवडणूक लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. आतापर्यंत हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन होऊ नये, म्हणून आम्ही लढत नव्हतो, पण आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हालाच लढावे लागेल, असे ते म्हणाले.पक्ष म्हणून त्यांना अधिकार-शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोललेच पाहिजे असे नाही. त्यांनी त्यांची भूमिका आज मांडली. आम्ही भविष्यात लोकसभा, विधानसभेचा विचार करू, तेव्हा काय ती भूमिका मांडू. पक्ष म्हणून भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार आहे. - खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपानिवडणुकीला आणखी अवधी आहे. सध्या तरी आमची युती आहे. आमचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार