शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना उद्धव ठाकरेंची धास्ती, त्यामुळेच मुंबई दौरे वाढलेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:40 IST

Maharashtra News: तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का, असा खोचक सवाल करत शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून, रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले होते. यावरून ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळेच कंठघोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. 

शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करतायत

सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच शंभुराज यांचे कौतुक वाटते. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. तुमच्या बालेकिल्ल्यात येऊन बोलत आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी डिवचले. 

तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का?

तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही. तुम्ही आजोबांच्या नावाला काळीमा फासली. शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी भाजप, शिंदे-फडणवीस सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोशारीजी. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती!, असे ट्विट करत सुषमा अंधारेंनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी