शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना उद्धव ठाकरेंची धास्ती, त्यामुळेच मुंबई दौरे वाढलेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:40 IST

Maharashtra News: तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का, असा खोचक सवाल करत शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून, रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले होते. यावरून ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळेच कंठघोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. 

शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करतायत

सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच शंभुराज यांचे कौतुक वाटते. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. तुमच्या बालेकिल्ल्यात येऊन बोलत आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी डिवचले. 

तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का?

तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही. तुम्ही आजोबांच्या नावाला काळीमा फासली. शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी भाजप, शिंदे-फडणवीस सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोशारीजी. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती!, असे ट्विट करत सुषमा अंधारेंनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी