शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना उद्धव ठाकरेंची धास्ती, त्यामुळेच मुंबई दौरे वाढलेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:40 IST

Maharashtra News: तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का, असा खोचक सवाल करत शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून, रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले होते. यावरून ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळेच कंठघोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. 

शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करतायत

सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच शंभुराज यांचे कौतुक वाटते. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. तुमच्या बालेकिल्ल्यात येऊन बोलत आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी डिवचले. 

तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का?

तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही. तुम्ही आजोबांच्या नावाला काळीमा फासली. शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी भाजप, शिंदे-फडणवीस सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोशारीजी. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती!, असे ट्विट करत सुषमा अंधारेंनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी