शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?” ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 09:11 IST

Maharashtra News: चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येहून आल्यावर आता सरकार बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: गारपिटीचे तडाखे आणि अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा भयंकर धुमाकूळ सुरू आहे. गारपिटीच्या तडाख्याने हजारो हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतांमध्ये गारांचा खच पडला आहे. कश्मीर वा हिमाचलमध्ये हिमवर्षावानंतर जशी बर्फाची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसते, तशी अवस्था उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

नाशिक, नगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तर या गारपिटीचे रूप अधिकच रौद्र होते. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिके व फळबागांची मोठी हानी झाली. जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.  

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? 

सतत येणाऱ्या अवकाळीच्या तडाख्याने मका, ज्वारी, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले. गोळीबाराचा वर्षाव व्हावा, अशी गारपीट झाल्याने शेतातील कलिंगड व खरबुजांच्या चिंधडय़ा उडाल्या. द्राक्ष बागा कोलमडून पडल्या. द्राक्षांबरोबरच केळी व संत्र्याच्या बागांचेही अवकाळी पावसाने अपरिमित नुकसान झाले आहे. कोकणातही जांभूळ, काजू, कोकम, आंब्याला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दिलेला हा तिसरा फटका आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेचा ससेमिरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे या अरिष्टात सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत नाही. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. सुडाच्या राजकारणातच रमलेल्या राज्यकर्त्यांकडे शेतकऱयांचे दुःख समजून घेण्यासाठी, त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी व शेतकऱयांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? 

जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय?

जे उगवले, पिकले ते निम्म्याहून अधिक अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात उद्ध्वस्त होते आणि जे पीक हाती आले त्याला भाव मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची दारुण अवस्था झाली आहे. आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी नियम व फायलींच्या प्रवासात कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱयांच्या मनात बळावते आहे. शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जनतेला वाऱयावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? बांधावर येणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱयांनी आता हे प्रश्न विचारलेच पाहिजेत!, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाने शिंदे आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :RainपाऊसShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीPoliticsराजकारण