शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?” ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 09:11 IST

Maharashtra News: चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येहून आल्यावर आता सरकार बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: गारपिटीचे तडाखे आणि अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा भयंकर धुमाकूळ सुरू आहे. गारपिटीच्या तडाख्याने हजारो हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतांमध्ये गारांचा खच पडला आहे. कश्मीर वा हिमाचलमध्ये हिमवर्षावानंतर जशी बर्फाची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसते, तशी अवस्था उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

नाशिक, नगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तर या गारपिटीचे रूप अधिकच रौद्र होते. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिके व फळबागांची मोठी हानी झाली. जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.  

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? 

सतत येणाऱ्या अवकाळीच्या तडाख्याने मका, ज्वारी, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले. गोळीबाराचा वर्षाव व्हावा, अशी गारपीट झाल्याने शेतातील कलिंगड व खरबुजांच्या चिंधडय़ा उडाल्या. द्राक्ष बागा कोलमडून पडल्या. द्राक्षांबरोबरच केळी व संत्र्याच्या बागांचेही अवकाळी पावसाने अपरिमित नुकसान झाले आहे. कोकणातही जांभूळ, काजू, कोकम, आंब्याला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दिलेला हा तिसरा फटका आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेचा ससेमिरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे या अरिष्टात सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत नाही. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. सुडाच्या राजकारणातच रमलेल्या राज्यकर्त्यांकडे शेतकऱयांचे दुःख समजून घेण्यासाठी, त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी व शेतकऱयांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? 

जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय?

जे उगवले, पिकले ते निम्म्याहून अधिक अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात उद्ध्वस्त होते आणि जे पीक हाती आले त्याला भाव मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची दारुण अवस्था झाली आहे. आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी नियम व फायलींच्या प्रवासात कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱयांच्या मनात बळावते आहे. शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जनतेला वाऱयावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? बांधावर येणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱयांनी आता हे प्रश्न विचारलेच पाहिजेत!, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाने शिंदे आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :RainपाऊसShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीPoliticsराजकारण